
Latest News
Stories shaping public discourse
Recently Updated
New reports and voices from the ground

‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’
जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना भारतातील अनेक भाग ४५ ते ४८ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करत आहेत. उष्णतेची लाट ही केवळ हवामानाची समस्या राहिलेली नसून ती आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न बनली आहे. वातानुकूलित खोल्यांतील लोक आणि उन्हात काम करणारे मजूर यांच्यातील दरी वाढत्या तापमानामुळे अधिक स्पष्ट होत आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बालकं, शेतमजूर, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि स्थलांतरित कुटुंबांना बसत आहे. तापती शहरं थंड करण्यासाठी हरित क्षेत्रं, शीत छतं आणि लोककेंद्रित नगररचना यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे.

चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. खनिज संपत्तीच्या उत्खननासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे आदिवासी जीवन, जैवविविधता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. चंद्रपूरमधील प्रदूषण आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा अनुभव गडचिरोलीसमोर इशारा म्हणून उभा आहे. वाघांचे कॉरिडॉर खंडित होत असताना जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांचे अस्तित्वही संकटात सापडत आहे.

"कोकण अणुऊर्जा केंद्र बनणार? जैतापूर ते बारसू नव्या संघर्षाची चाहूल"
आज जगभरात पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारने कोकणात २५,४०० मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी ६.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य बारसू, पूर्णगड, देवगड आणि जैतापूर परिसरात प्रस्तावित प्रकल्पांमुळे रोजगार आणि विकासाच्या दाव्यांसोबतच पर्यावरण, मासेमारी, शेती, फळबागा आणि स्थानिक उपजीविकेच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील दशकभराचा संघर्ष अद्याप स्मरणात असतानाच, कोकणला देशातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा पट्ट्यांपैकी एक बनवण्याच्या हालचालींमुळे नव्या जनआंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या चर्चांमध्ये पर्यावरणीय न्याय, लोकशाही संमती आणि स्थानिक समुदायांचे हक्क यांना किती महत्त्व दिले जाते, याची कसोटी आता पुन्हा एकदा कोकणात लागणार आहे.

सरकारची वाट न पाहता गाव उभं राहिलं; आदिवासींच्या ‘हलम्याने’ वाचवली विहीर
पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी योजनांची जबाबदारी नसून सामूहिक कृतीची प्रक्रिया असल्याचं मध्य प्रदेशातील एका आदिवासी गावाने दाखवून दिलं आहे. झाबुआ जिल्ह्यातील बोरपाडा गावात तीन वर्षे गाळाने भरून गेलेली विहीर ग्रामस्थांनी 'हलमा' या पारंपरिक सामूहिक श्रमपद्धतीच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केली. भील आदिवासी समाजाची ही शतकानुशतकांची परंपरा केवळ श्रमदानाची नाही, तर जलसंवर्धन, सामाजिक ऐक्य आणि स्वावलंबनाचा जिवंत वारसा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, बोरपाडाची ही कथा सांगते की पर्यावरण वाचवण्याचे अनेक उपाय आपल्या लोकपरंपरांमध्येच दडलेले आहेत.
The Forgotten Story of Ava Cordero a trans victim in Epstein files
While the Epstein scandal exposed a massive network of exploitation, the story of Ava Cordero—a transgender woman lured into Jeffrey Epstein's web at age 16—remains largely forgotten. From a dismissed lawsuit and sensationalist media attacks to her struggles with homelessness, Cordero’s tragedy highlights the devastating intersection of trauma, legal hurdles, and transgender erasure within the mainstream media and the #MeToo movement.

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या ट्रान्स पीडितेची कहाणी...
जेफ्री एपस्टीन प्रकरणातील अनेक पीडित महिलांच्या कथा जगभर चर्चेत आल्या. त्यांना न्यायासाठी पाठिंबा मिळाला, त्यांच्या वेदनांवर चर्चा झाली आणि त्यांचे अनुभव लाखो लोकांपर्यंत पोहोचले. मात्र या प्रकरणात एवा कॉर्डेरो नावाची एक ट्रान्स महिला अशी होती, जिने अल्पवयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली, पण तिची कथा मुख्य प्रवाहातील चर्चेत फारशी कधी आलीच नाही. एवा कॉर्डेरोच्या बालपणापासून ते जेफ्री एपस्टीनविरोधातील न्यायालयीन लढ्यापर्यंत, माध्यमांकडून झालेल्या वागणुकीपासून ते तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बाईमाणूसच्या या विशेष लेखातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.
Trending Now
The Conversations capturing public attention

पंतप्रधान म्हणतात, ‘तयार रहा’... विद्यार्थी, रिक्शावाले, पेट्रोल पंपचे मालक, शेतकरी, हॉटेलवाले म्हणतात, म्हणजे उपाशी मरायचं का…?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये इंधनासाठी लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांमध्ये भीतीपोटी साठेबाजी वाढताना दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स, मेस आणि लघुउद्योग बंद पडत असून विद्यार्थ्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी इंधनासाठी रांगेत उभे असतानाच मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत.

ज्या सैनिकाने देशाची सेवा केली, त्याच्याच अंत्यसंस्कारात जातीय भेदभावाची घटना घडली…!
दलित समाजातील एका निवृत्त सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी जातीय भेदभाव झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील चिन्नापूर गावात घडली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, गावात पोहोचल्यावर त्यांना बहुतेक दुकाने आणि हॉटेल्स बंद आढळली.

हे गाव लई न्यारं… नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय, आता हे गाव झालं ‘जातमुक्त’!
संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली. आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.

‘’डॉक्टर नाही, रुग्णालयाला टाळं, मग बाळाची प्रसूती बाण-बांबू अन् ब्लेडने होते…’’ नंदुरबारमधील धगधगीत वास्तव
नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बाळाचा जन्म अजूनही रुग्णालयात नाही, तर घरात, बाण,बांबू, ब्लेडच्या आधारावर होतो. अनेकदा ‘पुरुषदाई’ करतात गरोदर महिलांची प्रसुती… खराब रस्ते, बंद उपकेंद्रे, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि ॲम्बुलन्स न पोहोचणं यामुळे घरगुती प्रसूती ही परंपरा नसून मजबुरी बनली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दाव्यांपलीकडचं वास्तव उघड करणारा ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट…

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अॅप्सचा आधार मात्र अशा अॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’
‘’होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.’’ असे हसीन मस्तान का म्हणतेय…?

Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !
Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !

बाई पुरुषावर बलात्कार करू शकते का? कायदा काय सांगतो?
पुणे शहरात महिलेकडून पुरुषावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. सामान्यतः अत्याचाराच्या तक्रारी महिलांकडून येतात, मात्र या वेळी चित्र पूर्ण उलट आहे. विवाहित दोन मुलींचा बाप असलेल्या पुरुषाने धैर्य एकवटून पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमुळे पीडित फक्त स्त्रीच असते, हा समाजातील एकतर्फी समज ढासळू लागल्याचं दिसत आहे. या केसमधून पुरुषांवरील लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंगचं वास्तवही पुढे येत असल्याचं जाणवत आहे.

Manusmruti Dahan : मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या 'त्या दोन' भीमकन्यांची थरारक कहाणी | Baimanus
8 ऑक्टोबर 2018. मातीकाम करणाऱ्या शिलाताईंना सोबत घेऊन कांताबाईंनं जयपूर गाठलं.. जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या ह्याच त्या दोघी... या कृत्यामुळे जयपूरच्या पोलीस कस्टडीत आठ दिवस आणि 18 दिवस जेल मध्ये काढून जामिनावर पुन्हा संभाजीनगरला येणाऱ्या कांता अहिरे आणि शिलाताई पवार यांची ही धाडसी कथा..
0Tumbbad: where humans scare the ghost
The film 'Tumbbad,' released in 2018, broke the parameters of the Indian cinema. The film, initially, didn't perform well at the box office but it was highly appreciated by the connoisseurs. Nowadays, films are being re-released in theatre and so is 'Tumbbad'
Latest Videos
Video stories and visual journalism

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब
एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
Photo Gallery
Visual stories capturing voices from the ground

Indore Water Tragedy: Systemic Neglect Leads to Fatal Outbreak
A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

Saving the Aravallis: A Fight to Protect an Ancient Lifeline
31 Hills Vanished: The Visual Evidence Excerpt: Official records confirm the unthinkable: 31 out of 128 hills in the Aravalli range have physically vanished due to illegal mining. With groundwater levels sinking and the new "100-meter" rule leaving the foothills vulnerable, the ecological collapse is no longer a prediction—it is happening. Explore the timeline of destruction and the movement demanding justice.

Who is this Sadu Mata, where men wearing vermilion and wearing sarees play Garba?

One should experience 'Vari'!

"How many Supreme Court judges are Dalit-Tribals?"




