
Stories shaping public discourse
New reports and voices from the ground
Video stories and visual journalism

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
Visual stories capturing voices from the ground

A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

31 Hills Vanished: The Visual Evidence Excerpt: Official records confirm the unthinkable: 31 out of 128 hills in the Aravalli range have physically vanished due to illegal mining. With groundwater levels sinking and the new "100-meter" rule leaving the foothills vulnerable, the ecological collapse is no longer a prediction—it is happening. Explore the timeline of destruction and the movement demanding justice.




The Conversations capturing public attention

पोलीस कोठडीत असताना झालेल्या संशयित तरुणाच्या मृत्यू प्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये रिसोड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकरणात, न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय गंमत आहे पहा, लोकशाहीची जननी, संविधान, सबका साथ असं काही काही सांगणाऱ्या देशात अमूक फाइल, तमूक फाइल, धुरंधर १,२ असे सौहार्द बिघडवणारे सिनेमे झुंडी झुंडीने पाहिले जातात. सत्ताधारी जणू काही फार मोठे देशकार्य आहे, अशा आविर्भावात अशा सिनेमांसाठी आवर्जून वेळ काढतात. थेट पंतप्रधान जाहीर सभांतून आडून आडून सिनेमाची जाहिरात करतात. पण उठता बसता संविधानाची साक्ष काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांपैकी कोणी ‘मैं वापस आऊंगा’ पाहात असल्याचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत नाही. राज्य सरकार या सिनेमाला टॅक्स फ्री करण्यासाठी पुढाकार घेत नाही. सहकुटुंब सहपरिवार परधर्मद्वेषावर आधारलेली हिंसा बघायला जाणाऱ्यांपर्यंत ‘मैं वापस आऊंगा’ पोहोचतच नाही.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार पेसा मोबिलायझर पदांवर गंडांतर; राज्यभरातील मोबिलायझर्स आंदोलनाच्या पवित्र्यात. गडचिरोली, नंदुरबारसारख्या दुर्गम आदिवासी भागात एका मोबिलायझरकडे तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी देणे व्यवहार्य नसल्याचा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा दावा. पेसा मोबिलायझर्सची संख्या कमी झाल्यास ग्रामसभा, वनहक्क, लघुवनोपज व्यवस्थापन आणि आदिवासी स्वराज्याच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होण्याची भीती तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त.

As India moves towards its Net Zero 2070 target, hydrogen-powered trains are emerging as a key innovation for sustainable rail transport. Powered by hydrogen fuel cells, these trains produce only water vapour, significantly reducing carbon emissions and noise pollution. While challenges such as infrastructure, cost, and green hydrogen production remain, the technology promises cleaner mobility, energy security, and a new era for Indian Railways and India's green economy.

एका कागदाच्या तुकड्यावर छापलेल्या १०-१२ अंकांच्या आकड्याने गरिबांच्या ताटातील घास हिरावला जाऊ शकतो का? प्रशासन डिजिटल डेटाच्या नावाखाली 'शुद्धीकरणाची' मोहीम राबवत आहे, पण या प्रक्रियेत 'पात्र' कोण आणि 'अपात्र' कोण, याचा निर्णय केवळ जुन्या फाइल्सच्या आधारे घेणे म्हणजे गरिबांच्या अस्तित्वावरचा डिजिटल सर्जिकल स्ट्राईक आहे. केवळ कागदावरील आकडे बदलले म्हणून गरिबांच्या ताटातील घास हिरावला जाणं, हे प्रशासकीय शहाणपण की माणुसकीचा पराभव? १३ वर्षांपूर्वीच्या निकषांचा 'जुना चष्मा' घालून, डिजिटल युगात गरिबांना 'अपात्र' ठरवण्याचा खेळ आता थांबायला हवा…

पंजाबमध्ये नव्वदच्या दशकात दहशतवादाच्या नावाखाली हजारो शीख तरुण बेपत्ता झाल्याचा दावा पुराव्यांसह जगासमोर मांडणारे मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांचे १९९५ मध्ये घराबाहेरून अपहरण झाले आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या आयुष्यावर आधारित दिलजीत दोसांझचा 'पंजाब 95' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने तब्बल १२७ बदल सुचवले. निर्मात्यांनी ते नाकारल्यानंतर चित्रपट तीन वर्षे रखडला. अखेर नाव बदलून 'सतलुज' म्हणून तो झी५वर प्रदर्शित झाला खरा…मात्र अवघ्या दोन दिवसांतच तो ओटीटीवरूनही हटवण्यात आला. त्यामुळे जसवंत सिंह खालरा यांच्या हत्येइतकाच त्यांच्या सत्याचा प्रवासही आज तीन दशकांनंतर वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. खालरा यांनी उघड केलेले नेमके सत्य काय होते, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला इतका विरोध का झाला आणि 'सतलुज'भोवतीचा वाद नेमका काय आहे, याचा हा मागोवा.

स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सामंत यांनी स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच पुरुषांच्या लैंगिकतेचा, मानसिक आरोग्याचा आणि लैंगिक शिक्षणाचा प्रश्नही तितक्याच गांभीर्याने मांडला. लैंगिक गुन्ह्यांकडे केवळ शिक्षेच्या नव्हे तर जैविक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची भूमिका आजच्या काळात अधिकच महत्त्वाची ठरते.
'ईठा' चित्रपटाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी नावावरील आक्षेप मागे घेतला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या स्पष्टीकरणानंतर कुटुंबीयांचे समाधान झाले असले, तरी चित्रपटात 'नारायणगाव'चा उल्लेख नसल्याची खंत कायम आहे. 'बाईमाणूस'ने सर्वप्रथम नारायणगावात पोहोचून या वादाचा सविस्तर पाठपुरावा केला होता. आता श्रद्धा कपूरसह 'ईठा'ची संपूर्ण टीम प्रदर्शनापूर्वी नारायणगावला भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चार प्रमुख विषारी सापांसाठी देशभर एकच पॉलीव्हॅलंट प्रतिविष वापरले जाते. मात्र सापांच्या विषातील प्रादेशिक फरक, दुर्गम भागातील उपचारांची उपलब्धता, मृत्यूंच्या आकडेवारीतील तफावत आणि महाराष्ट्रासाठी स्वतंत्र प्रादेशिक विष बँकेची गरज यावर आधारित हा सविस्तर आढावा.
सिया गोयल प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच तेलंगणात पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला. पहिल्यांदा टेरेसवरून ढकलूनही पती वाचला. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून टॉयलेट क्लिनर आणि भूल देणारे औषध दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नर्स पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एका साथीदाराला अटक केलीये. संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.