
Latest News
Stories shaping public discourse
Recently Updated
New reports and voices from the ground

‘’मला पाणी द्या, मी मरेन’’... आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या!
तथाकथित उच्चजातीय तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातील केतन या दलित तरुणाची अतिशय क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मुंबईत कामाला असलेल्या केतनला त्याच्या प्रेयसीने फोन करून गावी बोलावलं आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियानी केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या! उत्तराखंड सरकारने केतनच्या कुटुंबाला आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली असून मुलीचे वडील यशवीर सिंह पंवार आणि आजोबा विद्या सिंह पंवार यांना अटक करण्यात आली आहे.

अस्सी: 'पुरुषी' भावविश्व उलगडणारा सिनेमा…
बलात्काराच्या एका प्रकरणाभोवती फिरणारा अनुभव सिन्हांचा 'अस्सी' हा चित्रपट प्रथमदर्शनी स्त्रियांवरील हिंसेची कथा वाटतो. मात्र कथानक जसजसं उलगडत जातं, तसतसा हा चित्रपट हिंसेच्या मुळाशी असलेल्या पुरुषी भावविश्वाचा शोध घेऊ लागतो. आरोपींपासून ते पीडितेच्या पतीपर्यंत, न्यायव्यवस्थेपासून ते पोलीस यंत्रणेपर्यंत आणि एका सहा वर्षांच्या मुलापासून ते गुप्तहेरापर्यंत विविध पुरुष व्यक्तिरेखा या चित्रपटात समोर येतात. त्यांच्यामधून पुरुषत्वाची अनेक परस्परविरोधी रूपं उलगडत जातात. स्त्रियांवरील अत्याचार हा केवळ स्त्रियांचा प्रश्न नसून पुरुषत्वाची घडण, सत्ता, हिंसा, काळजी, जबाबदारी आणि न्याय यांच्या गुंतागुंतीच्या नात्यांशी जोडलेला सामाजिक प्रश्न आहे, हे 'अस्सी' ठामपणे अधोरेखित करतो.

‘’मुलं तर आमच्यासारखी दिसत नाहीत, मग आम्ही कुणाची मुलं वाढवत आहोत?’’ IVF मधील एका संशयित चुकीने हादरलं आयुष्य…
अपत्यप्राप्तीच्या आशेने राहुल आणि मीनू राठोड यांनी IVF प्रक्रियेचा आधार घेतला. उपचार यशस्वी झाले आणि त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचे आगमन झाले. मात्र मुली मोठ्या होत असताना त्यांच्या काही शारीरिक वैशिष्ट्यांबाबत राठोड दांपत्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. ही शंका इतकी वाढली की अखेर त्यांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. डीएनए चाचणीच्या निष्कर्षांनी या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलींचा आनुवंशिक संबंध आई-वडिलांशी नसल्याचा दावा समोर आल्यानंतर IVF प्रक्रियेतील संभाव्य त्रुटींची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे एका कुटुंबाचा वैयक्तिक संघर्ष सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. वैद्यकीय उत्तरदायित्व, IVF केंद्रांतील सुरक्षा व्यवस्था, ART कायद्याची अंमलबजावणी आणि नुकसानभरपाई यांसारखे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

थेट युद्ध भारतीयांना मारणार नाही पण कदाचित खतांची टंचाई कदाचित मारेल!
पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताला होणारा गॅस आणि युरियाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फटका देशाच्या अन्नसुरक्षेला बसून सर्वसामान्यांच्या ताटातील अन्न महाग होऊ शकते. शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसू नये म्हणून सरकारला खतांवरील अनुदानाचा भार वाढवावा लागेल. यामुळे रस्ते, शाळा आणि रुग्णालयांसाठी असलेला निधी खतांकडे वळवावा लागल्याने देशाच्या विकासाला मोठा फटका बसेल.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'सेफ्टी ऑडिट'चं झालं काय? नाशिक, माळशिरस... मृत्यूचं हे 'सत्र' असंच सुरू राहणार का..
नाशिकच्या दिंडोरी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही रस्त्यालगतच्या विहिरींचे 'सेफ्टी ऑडिट' रखडलं;माळशिरसमध्ये विहिरीला कठडा नसल्याने पुन्हा ८ भाविकांचा निष्पाप बळी अपघात घडताच स्थानिक तरुण इरफानने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली… "वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन आणि प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच"; माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तीव्र संताप.

शेतात ‘तिचे’ हात, कागदावर मात्र ‘त्याचे’ नाव… महिला शेतकऱ्यांच्या अदृश्य श्रमांची आणि अपुऱ्या हक्कांची कहाणी!
ग्रामीण भारतातील जवळपास ८० टक्के महिला शेतीशी जोडलेल्या आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनापासून धान्य प्रक्रियेपर्यंत बहुतेक कृषी कामांमध्ये त्यांचे योगदान निर्णायक आहे. शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांच्या खांद्यावर असतानाही त्यांच्या नावावर केवळ १२.८ टक्के जमीन आहे. त्यामुळे "शेती करणारी" आणि "शेतकरी" यांच्यातील दरी आजही कायम आहे. जमिनीची मालकी नसल्यामुळे कर्ज, विमा, पीकनुकसान भरपाई आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या श्रमाची नोंद आहे, पण हक्कांची नाही. संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र सरकार महिला शेतकरी सशक्तीकरण विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या चर्चेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

दलित साहित्याचे विद्रोही शिल्पकार… 'अर्जुन डांगळे'
मराठी साहित्यविश्वात आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य केवळ साहित्यनिर्मितीपुरते मर्यादित राहत नाही, तर ते समाजपरिवर्तनाच्या व्यापक प्रक्रियेचे वाहक बनते. अर्जुन ठमाजी डांगळे हे असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, संघटक आणि आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजमनावर आपला ठसा उमटविला आहे. आज त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाचा गौरव करणे ही संपूर्ण मराठी समाजाची जबाबदारी आहे.

सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण: 'सक्षमचा धाकटा भाऊ गैरवर्तन करत होता' - आंचल मामीडवारचा गंभीर आरोप
नांदेडमधील गाजलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात नवे वळण आले आहे. सक्षमचे घर सोडल्याबद्दल टीकेचा सामना करणाऱ्या आंचल मामीडवारने प्रथमच माध्यमांसमोर येत गंभीर आरोप केले आहेत. सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता आणि तक्रार करूनही विश्वास ठेवला गेला नाही, असा दावा आंचलने केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर प्रकरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Trending Now
The Conversations capturing public attention

पंतप्रधान म्हणतात, ‘तयार रहा’... विद्यार्थी, रिक्शावाले, पेट्रोल पंपचे मालक, शेतकरी, हॉटेलवाले म्हणतात, म्हणजे उपाशी मरायचं का…?
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये इंधनासाठी लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांमध्ये भीतीपोटी साठेबाजी वाढताना दिसत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स, मेस आणि लघुउद्योग बंद पडत असून विद्यार्थ्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत असून शेतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी इंधनासाठी रांगेत उभे असतानाच मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत.

ज्या सैनिकाने देशाची सेवा केली, त्याच्याच अंत्यसंस्कारात जातीय भेदभावाची घटना घडली…!
दलित समाजातील एका निवृत्त सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी जातीय भेदभाव झाल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील चिन्नापूर गावात घडली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, गावात पोहोचल्यावर त्यांना बहुतेक दुकाने आणि हॉटेल्स बंद आढळली.

हे गाव लई न्यारं… नेवाशातील ‘सौंदाळा’चा आणखी एक ऐतिहासिक निर्णय, आता हे गाव झालं ‘जातमुक्त’!
संत ज्ञानेश्वर माउलींच्या भूमीतील नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावांत जात, पंथ, धर्म, वंश याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान आहेत. 'माझी जात मानव' ही भावना स्वीकारली. आंतरजातीय विवाह होतील, त्यासाठी सर्व मदत केली जाईल.

‘’डॉक्टर नाही, रुग्णालयाला टाळं, मग बाळाची प्रसूती बाण-बांबू अन् ब्लेडने होते…’’ नंदुरबारमधील धगधगीत वास्तव
नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बाळाचा जन्म अजूनही रुग्णालयात नाही, तर घरात, बाण,बांबू, ब्लेडच्या आधारावर होतो. अनेकदा ‘पुरुषदाई’ करतात गरोदर महिलांची प्रसुती… खराब रस्ते, बंद उपकेंद्रे, अपुरी आरोग्य व्यवस्था आणि ॲम्बुलन्स न पोहोचणं यामुळे घरगुती प्रसूती ही परंपरा नसून मजबुरी बनली आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दाव्यांपलीकडचं वास्तव उघड करणारा ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट…

‘क्विअर’ व्यक्तींच्या ‘डेटिंग अॅप्स’ चा एक भयावह चेहरा, जिथे आहे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक
क्विअर व्यक्तींना पार्टनर किंवा मित्र शोधण्यासाठी घ्यावा लागतो डेटिंग अॅप्सचा आधार मात्र अशा अॅप्सच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. क्वियर डेटींग अॅप, ग्रिंडरचा बेकायदेशीर उपयोग आणि त्यातली आव्हाने काय आहेत?

‘‘होय, मी डॉन हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव ‘हसीन’, मला मोदी आणि शहांनी न्याय मिळवून द्यावा’’
‘’होय, मी हाजी मस्तानची मुलगी आहे… माझं नाव हसीन हाजी मस्तान मिर्झा आणि माझ्यावर अतोनात अत्याचार झाले आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी असा कडक कायदा करावा की माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळू शकेल.’’ असे हसीन मस्तान का म्हणतेय…?

Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !
Sambhajinagar: राज्यातील सर्वात अनोखं गाव Chaundala | या गावात लागत नाही लग्न! दुमजली घरही नाही !

बाई पुरुषावर बलात्कार करू शकते का? कायदा काय सांगतो?
पुणे शहरात महिलेकडून पुरुषावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. सामान्यतः अत्याचाराच्या तक्रारी महिलांकडून येतात, मात्र या वेळी चित्र पूर्ण उलट आहे. विवाहित दोन मुलींचा बाप असलेल्या पुरुषाने धैर्य एकवटून पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमुळे पीडित फक्त स्त्रीच असते, हा समाजातील एकतर्फी समज ढासळू लागल्याचं दिसत आहे. या केसमधून पुरुषांवरील लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंगचं वास्तवही पुढे येत असल्याचं जाणवत आहे.

Manusmruti Dahan : मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या 'त्या दोन' भीमकन्यांची थरारक कहाणी | Baimanus
8 ऑक्टोबर 2018. मातीकाम करणाऱ्या शिलाताईंना सोबत घेऊन कांताबाईंनं जयपूर गाठलं.. जयपूर हायकोर्टाच्या आवारात असलेल्या मनूच्या पुतळ्याला काळं फासणाऱ्या ह्याच त्या दोघी... या कृत्यामुळे जयपूरच्या पोलीस कस्टडीत आठ दिवस आणि 18 दिवस जेल मध्ये काढून जामिनावर पुन्हा संभाजीनगरला येणाऱ्या कांता अहिरे आणि शिलाताई पवार यांची ही धाडसी कथा..
0Tumbbad: where humans scare the ghost
The film 'Tumbbad,' released in 2018, broke the parameters of the Indian cinema. The film, initially, didn't perform well at the box office but it was highly appreciated by the connoisseurs. Nowadays, films are being re-released in theatre and so is 'Tumbbad'
Latest Videos
Video stories and visual journalism

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

विषारी दारूने घेतले 18 बळी! | "महिलांचा आरोप - पोलिसांना हप्ता?"
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरलं! फुगेवाडी, दापोडी, काळेपडळ आणि हडपसर भागात विषारी दारूमुळे १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण मृत्यूशी झुंज देत आहेत. "घरून व्यवस्थित गेले, पण परत आल्यावर माशासारखे तडफडले..." स्थानिक महिलांचा हा आक्रोश काळजाला घर पाडणारा आहे. या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक महिलांनी थेट पोलिसांवर "हफ्ता घेतात" असा गंभीर आरोप केला आहे. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नक्की काय आहे संपूर्ण सत्य? पाहा 'बाईमाणूस'चा हा विशेष रिपोर्ट.

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब
एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
Photo Gallery
Visual stories capturing voices from the ground

Indore Water Tragedy: Systemic Neglect Leads to Fatal Outbreak
A catastrophic failure of civic infrastructure in Bhagirathpura has left at least 10 dead and thousands ill. Despite years of warnings and dozens of formal complaints about "acid-like" drinking water, administrative delays allowed a preventable sewage leak to turn into a deadly epidemic.

Saving the Aravallis: A Fight to Protect an Ancient Lifeline
31 Hills Vanished: The Visual Evidence Excerpt: Official records confirm the unthinkable: 31 out of 128 hills in the Aravalli range have physically vanished due to illegal mining. With groundwater levels sinking and the new "100-meter" rule leaving the foothills vulnerable, the ecological collapse is no longer a prediction—it is happening. Explore the timeline of destruction and the movement demanding justice.

Who is this Sadu Mata, where men wearing vermilion and wearing sarees play Garba?

One should experience 'Vari'!

"How many Supreme Court judges are Dalit-Tribals?"




