- टीम बाईमाणूस
आपल्या लहानपणी बाहुला-बाहुलीचा खेळ प्रत्येकाने खेळला असेल. मोहंजोदडोच्या उत्खननात हात, पाय हलणारी बाहुली आढळली मंडळी. भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात. ही निर्जीव कळसूत्री बाहुली आपल्या सजिवांचे मनोरंजन करत आली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत बाहुल्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. या बाहुल्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज 21 मार्चला जागतिक कठपुतळी म्हणजेच कळसुत्री दिवस साजरा होत आहे.
जागतिक कठपुतळी दिवसाची सुरुवात 21 मार्च 2003 रोजी फ्रान्समध्ये झाली. इराणची कठपुतली प्रस्तुतकर्ता जावेद जोलपाघरी यांच्या मनात हा दिवस साजरा करण्याची कल्पना आली. 2000 मध्ये मॅग्डेबर्गने हा प्रस्ताव 18 व्या UNIMA परिषदेत विचारार्थ ठेवला. 2 वर्षांनंतर जून 2002 मध्ये अटलांटा कौन्सिलने ते आनंदाने स्वीकारले. हा दिवस 2003 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला, तेव्हापासून हा दिवस भारत आणि जगातील इतर देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्राचीन लोककला लोकांपर्यंत पोहोचवणे आणि येणार्या पिढीला त्याची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कारण कठपुतळी हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर लोकांना जागरूक करण्याचे सशक्त माध्यम आहे
कळसूत्री बाहुल्या म्हणजे सूत्राच्या आधारे त्यांची हालचाल करून सूत्रधार पडद्यामागे राहून पडद्यावर एखादा प्रसंग, कथा, नाट्य रंगवतो. सूत्रधार म्हणजे ‘जो दोरीने नियंत्रण करतो’, इकडे सूत्र म्हणजे दोरी असा अर्थ होतो.
भारतीय संस्कृतीतील प्राचीन रंगमंच ज्या संस्कृत नाटकांनी गाजवला, त्या नाट्यसंस्कृतीचे मूळ या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात आहे, असे अभ्यासक मानतात. विशेष म्हणजे भारतीय सिनेसृष्टीच्या विकासाला याच भारतीय संस्कृत नाट्यभूमीची पार्श्वभूमी आहे. 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात दृक व श्राव्य यांचे एकत्रित वापराचे तंत्र सिनेसृष्टीत विकासित झालेले नसले तरी, भारतीय कलामंचाला दृकश्राव्य खेळाचा प्रदीर्घ असा इतिहास आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात असणारा सूत्रधार हा पुढे संस्कृत नाटिकांचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसते. संस्कृत भाषेचे व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक रिचर्ड पिशेल यांनी आपल्या ‘होम ऑफ पपेट प्ले’ या ग्रंथात भारताचा उल्लेख ‘कळसूत्री बाहुल्यांचे माहेरघर’ असा केला आहे. या प्राचीन कळसूत्री बाहुल्यांचा इतिहास जगाच्या पटलावर जवळपास 4500 वर्षे इतका मागे जातो. या खेळाचे जुने पुरावे इजिप्त, मेसोपोटेमिया, सिंधू अशा प्राचीन संस्कृतींच्या गर्भात दडलेले आहेत.
भारतापुरते सांगायचे झाले तर, सिंधू संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर मातीची खेळणी, लहान मुखवटे, मातीपासून तयार केलेल्या लहान मूर्ती सापडल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील काहींना दोन्ही बाजूंनी छिद्रे असून त्यातून सूत्र टाकून ती कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे हलविण्याची सोय आहे. याशिवाय अनेक प्राचीन भारतीय साहित्यात कळसूत्री बाहुल्यांचे संदर्भ सापडतात. नृत्य, नाट्य यांसोबत मुखवटे व बाहुल्यांची रंगरंगोटी करून नाट्यप्रदर्शनाचे दाखले हे साहित्य देते. लेखक महेश केळुसकर यांनी त्यांच्या ‘चित्रकथी’ या संशोधनपर पुस्तकात एकंदरीतच या कलेचा आढावा घेतला आहे. भारताच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात दाखवला जातो. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांत, इतकेच काय दक्षिण मलबारच्या किनाऱ्यावर तो पाहावयास मिळतो.
ओरिसातील चामड्याच्या बाहुल्या ह्या प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या असतात. विशेषत: मेंढ्याच्या कातडीचा सर्रास उपयोग होतो. दोन फुटांहून त्यांची उंची अधिक नसते, आणि त्यांच्या रचनेत बालसुलभ सहजता असते. पुराणातील विविध व्यक्तिरेखांच्या बाहुल्यांप्रमाणेच वातावरणनिर्मितीसाठी झाडे, तंबू, सिंहासने यांच्या चामडी प्रतिकृतीही ओरिसातील खेळात उपयोगात आणल्या जातात. ‘रावणछाया’ ह्या नावाने ओरिसात हा खेळ ओळखला जातो व वर्षातील कुठल्याही वेळी सादर केला जातो.
तामिळनाडूत हाच खेळ ‘पवई कुठू’ म्हणजेच ‘ललनांचे नृत्य’ या नावाने संबोधिला जातो. त्यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, राक्षसी आणि दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी या चामड्याच्या बाहुल्या लक्ष्मी देवतेप्रमाणे नाचल्या. तामिळनाडूत वसंत ऋतूतील उत्सवात, शैव मंदिराबाहेर, दुष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी, ‘पवई कुठू’चे खेळ करण्याची प्रथा आहे. तामिळनाडूतील छायाबाहुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना उंची दागिन्यांनी सजवलेले असते. शिवाय त्या अचलित म्हणजे हालचाल न करणाऱ्या असतात. चार बांबूंच्या खांबांवर दोन लुगड्यांचा फेर धरून पडदा केला जातो आणि या पडद्यावर आतल्या बाजूने सगळ्या छायाबाहुल्या दृश्याच्या अनुक्रमानुसार टोचून ठेवल्या जातात. त्या बाहुल्यांच्या मागे तेलाचे टांगते दिवे असतात. त्याहीमागे ताडाच्या चटईची भिंत आधारासाठी असते. क्वचित ह्या बाहुल्या हालतातही; पण सर्वसाधारणपणे त्यांच्या छाया स्थिर असतात.
केरळमध्ये शूरनूरजवळचे कुंथर हे खेडे संपूर्णपणे छायाबाहुल्यांच्या खेळासाठी वाहून घेतलेले आहे. तेथील बाहुलेकर मूळ आख्याने तामीळमधून कथन करतात आणि लगेचच त्यांचे मल्याळममध्ये भाषांतर करून सांगतात. त्यांच्या खेळावर तामिळनाडूचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. कर्नाटकातील ‘चकाला गोंबी आटा’ हा छायाबाहुल्यांचा खेळ फक्त शिवमंदिराबाहेर उत्सप्रसंगीच सादर केला जातो. बाहुल्यांच्या मागे दिव्यांची रांग नसते; तर कथक-गायक जशी कथा पुढे नेत जातो, त्याप्रमाणे पडद्यामागील कलाकार एकाच दिव्याच्या हालचाली करतो; जेणेकरून त्या त्या बाहुलीची छाया पडद्यावर दृश्यमान होते.
‘पवई कुठू’च्या पद्धतीप्रमाणेच मलबार किनाऱ्यावर छायाबाहुल्यांचा खेळ सादर केला जातो. फरक एवढाच की, ‘ओला पवई कुठू’ ह्या नावाने परिचित असलेल्या या खेळातील छायाबाहुल्या ताडाच्या पानांपासून बनवलेल्या असतात. ‘थोलु बोमाळट्टा’ या नावाने आंध्र प्रदेशातील छायाबाहुल्यांचा खेळ लोकप्रसिद्ध आहे. जातक कथांतील संदर्भ पाहता ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात आंध्रमध्ये ही कला अस्तित्वात आली असावी. सातवाहन, पल्लव, चालुक्य या राजवंशांनी ह्या कलेला राजाश्रय देऊन ती लोकप्रिय केली. सोळाव्या शतकात विजयनगरचा राजा कोना भुधा रेड्डी याच्या काळात ती खऱ्या अर्थाने भरभराटीला आली. त्याच्या काळात छायाबाहुल्यांच्या खेळासाठी तेलुगू भाषेत स्वतंत्रपणे ‘रामायण रंगनाथन’ हे आख्यान लिहिले गेले.
‘थोलु बोमालट्टा’मधील बाहुल्या मेंढे, गायी, बैल यांच्या चामड्यापासून बनवलेल्या असून त्यांचे आकार पात्रांच्या महत्त्वानुसार कमी-जास्त असतात. हे खेळ दाखवण्यासाठी 10 फूट उंच, 21 फूट लांब व 6 फूट खोल असा रंगमंच वापरला जातो. महाशिवरात्रीला शंकराच्या देवळाच्या बाहेर उघड्या जागेवर रंगमंच उभारून खेळ दाखवले जातात. पिंगुळी परंपरेतील छायाबाहुल्यांच्या खेळाला ‘चामड्याच्या जायती’ असे संबोधले जाते. बाहुल्या बकऱ्याच्या चामड्याच्या बनवलेल्या आहेत. तुणतुणे आणि हुडुक (डमरू) ही लोकवाद्ये वापरली जातात. या ताल हुडुकासाठी ‘उजळी’ म्हणजे गुरांच्या कोथळ्याच्या आतले चामडे वापरले जायचे. त्यामुळे आवाज कडक यायचा. गुरे फाडून चामडे सुकवणारा दलित वर्ग आता धर्मांतरानंतर ते काम करत नसल्यामुळे, उजळी मिळत नाही असे प्रस्तुत अभ्यासकास गणपत मसगे यांनी सांगितले. त्याऐवजी बेडकाची चामडी किंवा बकऱ्याचे कातडे वापरले जाते.
पिंगुळीचे ठाकर बाहुल्यांमागे तेलाचे दिवे न धरता ‘गोड्यातेलाची काडवात’ धरतात. पिंगुळीचे ठाकर चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आणि चामड्याच्या जायती म्हणजे छायाबाहुल्यांचे खेळ गावोगावी करतात. पिंगुळीतून बाहेर पडण्यापूर्वी ते दांडेकराला म्हणजे देवाचाराला (रक्षणकर्त्याला) गाऱ्हाणे घालतात. कठपुतळीचे प्रकार दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता आणि संस्कृतींची देवाणघेवाण, कठपुतळींचा आकार, प्रकार आणि ऑपरेशनमधील विविधतेसह, विविध प्रकारचे बाहुले प्रचलित झाले. जसे धाग्याची, सावलीची, काठीची, हातमोज्यांची कठपुतळी या सर्व कठपुतळी भारतात प्रचलित आहेत.
धाग्याची बाहुली – धाग्याची बाहुली स्वतःच त्याच्या नावावरून ओळखली जाते की ती त्यातील धाग्याला जोडून तयार केली जाते, नंतर धाग्याच्या बाहुलीचे जोडलेले भाग धाग्यांद्वारे संचलित केले जातात. त्यामुळे ती प्रभावीपणे नृत्य आणि अभिनय करताना दिसते. ती भारतातील राजस्थान, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रचलित आहे आणि या राज्यांच्या प्रचलित भाषेनुसार येथे कथा सांगितल्या जातात. राजस्थानात पपेट, ओरिसात कुंदेई, कर्नाटकात गोम्बेयट्टा आणि तामिळनाडूमध्ये बोम्मलट्टा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.
सावलीची कठपुतळी – नावाप्रमाणेच यात सावली नृत्य करताना दिसत आहे. हे पुतळे चामड्याचे असून ते आकाराने सपाट आहेत. संपूर्ण कथेसाठी प्रकाशाचा झोत म्हणून स्क्रीन मागून प्रकाशित केली जाते. पुतळे चालवले जातात जेणेकरून पडद्यासमोर बसलेल्या प्रेक्षकांना पडद्यावर सावली हलताना दिसेल, ही परंपरा ओरिसा, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये पारंपारिकपणे पाळली जाते. रॉड कठपुतळी – यात रॉड किंवा काठी असते. बाहुलीचा खालचा भाग रॉड किंवा काठीला जोडलेला असतो आणि त्यांच्याद्वारे चालवला जातो, ही कठपुतळी कला भारतातील बंगाल आणि ओरिसामध्ये प्रचलित आहे. बंगालचे पुतळे नृत्य आणि बिहारचे यमपुरी ही रॉड पुतळ्यांची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. ओरिसाचा पुतळा आकाराने थोडा लहान असतो. हातमोजा कठपुतळी – हे पुतळे हातात घातले जातात आणि म्हणूनच याला हातमोजा कठपुतळी किंवा तळहाताची कठपुतळी असेही म्हणतात. कलाकार पुतळ्याच्या तोंडावर आपली तर्जनी घालून आणि दोन्ही हातांमध्ये मधले बोट आणि अंगठा धारण करून या कठपुतळी संचलित करतो. भारतात, दस्ताना कठपुतळी परंपरा उत्तर प्रदेश, उडासा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये लोकप्रिय आहे. केरळमधील कठपुतली नाटके पावकुथू म्हणून ओळखली जातात.