Skip to main content

पुन्हा तेच…गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू!

Team BaiManus
Today
2 views
पुन्हा तेच…गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू!

टीम बाईमाणूस


  • चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 


  • या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


एकीकडे भारत महासत्ता होण्याच्या गप्पा आपण मारतो, राज्यकर्ते 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आणि गडचिरोली, चंद्रपूरसारख्या आदिवासी भागांचा चेहरामोहरा बदलत असल्याचे सांगतात. मात्र, आजही चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात खराब रस्त्यामुळे नागरिकांना वेळेत सुविधा न मिळाल्याने जीव गमावण्यापर्यंतची मन हेलावणारी घटना घडत आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्यामुळे प्रसूतीनंतर एका 25 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आहे. संगीता गेडाम असं या महिलेचे नाव आहे, या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य सुविधेच प्रश्न उपस्थित झाला आहे.


निवडणुकीच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून विकासाचे मोठ- मोठे दावे केले जातात, परंतू आदिवासी आणि दुर्गम भागात जमीनी स्तरावर या उलट चित्र आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून आला. खराब रस्त्यामुळे घोडनकप्पी गावात वेळेत वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे एका महिलेची प्रसूती झाली. तिने बाळाला जन्म दिला, मात्र महिलेला आपला जीव गमवावा लागला. संगीता गेडाम असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गावकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


User Image


बाळ जन्मलं अन् महिलेचा गेला जीव…


जिवती तालुक्यातील घोडनकप्पी हे गाव तेलंगाणा सीमेवर असून अतिशय दुर्गम असलेल्या या गावात पक्का रस्ता नाही. रविवारी पहाटे संगीता यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने रुग्णवाहिका मुख्य रस्त्यापर्यंतच येऊ शकली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिला डोंगर उतरवून रस्त्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला; मात्र, वेदना असह्य झाल्याने त्यांना पुन्हा घरी आणावे लागले. 


घरातच झालेल्या प्रसूतीत संगीताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र संगीता यांना प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव सुरू झाला. माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या पथकाने गावात पोहोचून उपचार सुरू केले. प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना खाजगी मालवाहू वाहनातून शंकरपठार येथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला.


दरम्यान, संबंधित घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येत होती. सोबतच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घोडनकप्पी गावात रस्ता नसल्यामुळे संबंधित महिलेला आधीच माहेरी जाण्याची किंवा पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या महिलेची पूर्ण व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, महिलेनेच माहेरी जाण्यास किंवा आरोग्य केंद्रात राहण्यास नकार दिला होता. आठव्या महिन्यातच त्या महिलेची प्रसूती झाली असून ही दुर्दैवी घटना घडली आहे. सोबतच जिल्हा आरोग्य प्रशासनाने अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करण्याचे देखील आवाहन नागरिकांना केलं आहे.


Share this article
मॉब लिंचिंग प्रकरणी 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा, निर्णय एकताच कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ
ताज्या घडामोडी

मॉब लिंचिंग प्रकरणी 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा, निर्णय एकताच कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ

मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील गाय तस्करीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने 2022 मध्ये गो-तस्करीचा संशयावरून जमावाने केलेल्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

3 min read
T
Team BaiManus
कधी आई, कधी आत्या, तर कधी आंचल... सक्षम ताटे प्रकरणात हे काय सुरू आहे?
ताज्या घडामोडी

कधी आई, कधी आत्या, तर कधी आंचल... सक्षम ताटे प्रकरणात हे काय सुरू आहे?

नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने काही दिवसांपूर्वी सक्षमच्या धाकट्या भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. ● आंचलच्या आरोपांनंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असताना आता सक्षमच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. इतकेच नव्हे तर आंचल आणि सक्षमचा भाऊ शिवम यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. ● त्यामुळे आधी ऑनर किलिंगमुळे चर्चेत आलेले हे प्रकरण आता परस्परविरोधी दावे, भावनिक प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

5 min read
T
Team BaiManus
‘’मुलं तर आमच्यासारखी दिसत नाहीत, मग आम्ही कुणाची मुलं वाढवत आहोत?’’ IVF मधील एका संशयित चुकीने हादरलं आयुष्य…
ताज्या घडामोडी

‘’मुलं तर आमच्यासारखी दिसत नाहीत, मग आम्ही कुणाची मुलं वाढवत आहोत?’’ IVF मधील एका संशयित चुकीने हादरलं आयुष्य…

अपत्यप्राप्तीच्या आशेने राहुल आणि मीनू राठोड यांनी IVF प्रक्रियेचा आधार घेतला. उपचार यशस्वी झाले आणि त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचे आगमन झाले. मात्र मुली मोठ्या होत असताना त्यांच्या काही शारीरिक वैशिष्ट्यांबाबत राठोड दांपत्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. ही शंका इतकी वाढली की अखेर त्यांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. डीएनए चाचणीच्या निष्कर्षांनी या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलींचा आनुवंशिक संबंध आई-वडिलांशी नसल्याचा दावा समोर आल्यानंतर IVF प्रक्रियेतील संभाव्य त्रुटींची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे एका कुटुंबाचा वैयक्तिक संघर्ष सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. वैद्यकीय उत्तरदायित्व, IVF केंद्रांतील सुरक्षा व्यवस्था, ART कायद्याची अंमलबजावणी आणि नुकसानभरपाई यांसारखे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

9 min read
R
Ritesh Shisode
थेट युद्ध भारतीयांना मारणार नाही पण कदाचित खतांची टंचाई कदाचित मारेल!
ताज्या घडामोडी

थेट युद्ध भारतीयांना मारणार नाही पण कदाचित खतांची टंचाई कदाचित मारेल!

पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताला होणारा गॅस आणि युरियाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फटका देशाच्या अन्नसुरक्षेला बसून सर्वसामान्यांच्या ताटातील अन्न महाग होऊ शकते. शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसू नये म्हणून सरकारला खतांवरील अनुदानाचा भार वाढवावा लागेल. यामुळे रस्ते, शाळा आणि रुग्णालयांसाठी असलेला निधी खतांकडे वळवावा लागल्याने देशाच्या विकासाला मोठा फटका बसेल.

5 min read
D
Divya Rai
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'सेफ्टी ऑडिट'चं झालं काय? नाशिक, माळशिरस... मृत्यूचं हे 'सत्र' असंच सुरू राहणार का..
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'सेफ्टी ऑडिट'चं झालं काय? नाशिक, माळशिरस... मृत्यूचं हे 'सत्र' असंच सुरू राहणार का..

नाशिकच्या दिंडोरी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही रस्त्यालगतच्या विहिरींचे 'सेफ्टी ऑडिट' रखडलं;माळशिरसमध्ये विहिरीला कठडा नसल्याने पुन्हा ८ भाविकांचा निष्पाप बळी अपघात घडताच स्थानिक तरुण इरफानने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली… "वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन आणि प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच"; माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तीव्र संताप.

3 min read
V
Vitthal Sable
शेतात ‘तिचे’ हात, कागदावर मात्र ‘त्याचे’ नाव… महिला शेतकऱ्यांच्या अदृश्य श्रमांची आणि अपुऱ्या हक्कांची कहाणी!
ताज्या घडामोडी

शेतात ‘तिचे’ हात, कागदावर मात्र ‘त्याचे’ नाव… महिला शेतकऱ्यांच्या अदृश्य श्रमांची आणि अपुऱ्या हक्कांची कहाणी!

ग्रामीण भारतातील जवळपास ८० टक्के महिला शेतीशी जोडलेल्या आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनापासून धान्य प्रक्रियेपर्यंत बहुतेक कृषी कामांमध्ये त्यांचे योगदान निर्णायक आहे. शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांच्या खांद्यावर असतानाही त्यांच्या नावावर केवळ १२.८ टक्के जमीन आहे. त्यामुळे "शेती करणारी" आणि "शेतकरी" यांच्यातील दरी आजही कायम आहे. जमिनीची मालकी नसल्यामुळे कर्ज, विमा, पीकनुकसान भरपाई आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या श्रमाची नोंद आहे, पण हक्कांची नाही. संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र सरकार महिला शेतकरी सशक्तीकरण विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या चर्चेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

8 min read
V
Vikas Meshram

Comments

Comments are currently disabled or loading...