Skip to main content

पारलिंगी कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये नाव-लिंग बदलाचा हक्क…

Apsara Aga
10 Jan 2026
10 views
पारलिंगी कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये नाव-लिंग बदलाचा हक्क…

अप्सरा आगा


  • नव्या नियमांमुळे पारलिंगी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नाव व लिंग बदलण्यासाठी कोणती नवीन सोय मिळाली?

  • नव्या प्रक्रियेमुळे ऑनलाइन सेवांमध्ये येणाऱ्या अडचणी कशा प्रमाणात कमी होतील?

  • नाव किंवा लिंग बदलासाठी काय अधिकृत प्रक्रिया पाळावी लागेल?


पारलिंगी (तृतीयपंथीय) समुदायाच्या ओळखीला अधिकृत मान्यता देणारा ऐतिहासिक निर्णय घेत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. आता राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पोर्टलवरून जारी होणारे ओळखपत्र हे ईपीएफ रेकॉर्डमध्ये नाव आणि लिंग बदलण्यासाठी वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारले जाणार आहे. आजवर केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे थांबलेल्या अनेक कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार असून, सामाजिक न्याय आणि समावेशकतेच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.


देशभरातील सर्व ईपीएफओ कार्यालयांमध्ये हा नियम लागू करण्यात आल्याने माहिती दुरुस्तीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक होणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नोंदी दुरुस्तीसाठी अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


आजपर्यंत ईपीएफ खात्यात नाव, आडनाव किंवा लिंगामध्ये बदल करताना अनेकदा कागदपत्रांअभावी अर्ज फेटाळले जात होते. काही ठिकाणी कार्यालयीन स्तरावर वेगवेगळे नियम लावले जात असल्याने सदस्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन ईपीएफओने जॉईंट डिक्लरेशन प्रक्रिया अधिक सोपी व पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे.

User Image


या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायासाठी ईपीएफओने प्रथमच स्वतंत्र आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. राष्ट्रीय ट्रान्सजेंडर पोर्टलवरून केंद्र सरकारकडून जारी करण्यात येणारे ‘ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट’ किंवा कार्ड आता ईपीएफ नोंदींमध्ये नाव आणि लिंग बदलण्यासाठी वैध दस्तऐवज म्हणून मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळखीनुसार नोंदी दुरुस्त करताना येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.


ईपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नावामध्ये केवळ किरकोळ दुरुस्ती असेल, जसे की स्पेलिंग बदल किंवा आडनावातील छोटा बदल, तर त्यासाठी संबंधित ओळखपत्र पुरेसे ठरणार आहे. मात्र नाव पूर्णपणे बदलायचे असल्यास किंवा आधीच्या नावाशी काहीही साधर्म्य नसेल, तर सरकारी राजपत्रातील (गॅझेट) अधिसूचना सादर करणे आवश्यक राहणार आहे.

संबंधित लेख वाचा:


‘मानद डॉक्टरेट’ मिळवलेल्या पारलिंगी चाँद तडवीचा उद्विग्न सवाल… ‘कायदा असूनही पोलीस भरतीत आम्हाला का स्थान नाही’?


या प्रक्रियेमुळे ईपीएफ खाते, यूएएन, पेंशन, क्लेम सेटलमेंट आणि ऑनलाइन सेवांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे पीएफ क्लेम केवळ नाव किंवा जन्मतारखेतील तफावतीमुळे अडकून पडत होते. नव्या नियमांमुळे अशा प्रकरणांमध्ये वेगाने निर्णय घेता येणार असल्याचे ईपीएफओकडून सांगण्यात आले आहे.


नाव आणि लिंग बदलण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याने आता कर्मचाऱ्यांना मानसिक तणाव, कागदपत्रांची अनिश्चितता आणि कार्यालयीन दिरंगाईचा सामना कमी करावा लागणार आहे. ईपीएफओच्या या नव्या नियमांमुळे सदस्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


हे कागदपत्रे आवश्यक


ईपीएफओकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नाव किंवा लिंग बदलण्यासाठी आता एकूण 18 प्रकारची वैध कागदपत्रे स्वीकारली जातील. यामध्ये पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्रे, बँक पासबुक, राशन कार्ड यांसारख्या सरकारी ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच कागदपत्रासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत धावपळ करावी लागणार नाही.



Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या  ट्रान्स पीडितेची कहाणी...
LGBTQIA+

एवा कॉर्डेरो : एपस्टीन प्रकरणातील दुर्लक्षित राहिलेल्या ट्रान्स पीडितेची कहाणी...

जेफ्री एपस्टीन प्रकरणातील अनेक पीडित महिलांच्या कथा जगभर चर्चेत आल्या. त्यांना न्यायासाठी पाठिंबा मिळाला, त्यांच्या वेदनांवर चर्चा झाली आणि त्यांचे अनुभव लाखो लोकांपर्यंत पोहोचले. मात्र या प्रकरणात एवा कॉर्डेरो नावाची एक ट्रान्स महिला अशी होती, जिने अल्पवयात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली, पण तिची कथा मुख्य प्रवाहातील चर्चेत फारशी कधी आलीच नाही. एवा कॉर्डेरोच्या बालपणापासून ते जेफ्री एपस्टीनविरोधातील न्यायालयीन लढ्यापर्यंत, माध्यमांकडून झालेल्या वागणुकीपासून ते तिच्या आजच्या आयुष्यापर्यंतचा प्रवास बाईमाणूसच्या या विशेष लेखातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

8 min read
S
Shonali Samarth
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade

Comments

Comments are currently disabled or loading...