Skip to main content

रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका

Sumitra Vasave
Today
3 min read
1 views
रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका
  • सुमित्रा वसावे


  • नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातून प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असलेल्या गर्भवतीचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. 


  • प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या त्या वृत्ताच्या आधारे डॉ. सुमीर डेंबला यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. मानवी हक्क आयोगाने यावर सविस्तर सुनावणी करून निकाल दिला आहे.


घटना आहे दोन वर्षांपूर्वीची, 15 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेली… जवळपास सगळ्याच माध्यमांनी या घटनेची दखल घेतली होती. झालं असं होतं की, नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बर्डी येथील गर्भवती मातेला मोलगी येथे नेत असताना अचानक रुग्णवाहिका नादुरुस्त झाली अन् मातेची बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला. त्याने या जगात पहिला श्वास घेतला अन् क्षणातच मातेची प्रकृती खालावली. तासभर रुग्णवाहिका सुरु न झाल्याने पर्यायी वाहनाने जिल्हा रुग्णालयात नेले असता तिने अखेरचा श्वास घेतला. क्षणभरापूर्वी जन्माला आलेलं निष्पाप, गोंडस बाळ पोरकं झालं.


हे प्रकरण चांगलंच गाजलं. आरोग्य खात्याची उदासीनता, निष्काळजीपणा, रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसणे, उपस्थित कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नसणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे यावरून गदारोळ उडाला होता. 


आता दोन वर्षांनंतर ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातून प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असलेल्या गर्भवतीचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या त्या वृत्ताच्या आधारे डॉ. सुमीर डेंबला यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. मानवी हक्क आयोगाने यावर सविस्तर सुनावणी करून निकाल दिला आहे.


कविताच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश


या महिलेच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांनी निकालपत्रात आरोग्य खात्याच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर निष्काळजी, उदासीनतेचा ठपका ठेवला आहे. या महिलेच्या मृत्यूबद्दल आरोग्य खात्याची निष्काळजी जबाबदार असल्याचे निष्कर्ष काढला आहे. याबद्दल महिलेच्या पतीला १६ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश राज्य शासनाला देण्यात आला. यापैकी आठ लाख रुपये मुलाच्या नावावर ठेवावेत, अशीही सूचना करण्यात आली.


User Imageमृत कविता राऊत (फोटो क्रेडिट BBC मराठी)


एवढा सारा गंभीर प्रकार घडून एका महिलेला आपली जीव गमवावा लागला तरीही जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांना अभय दिले होते. त्यांची काही चूक नाही, असा अहवाल दिला होता. याबद्दलही आयोगाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या या कृतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. 


मानवी हक्क आयोगाचे राज्य शासनावर ताशेरे


अत्यंत दुर्गम भागात राहणार्‍या या महिलेला प्रसुतीसाठी आरोग्य केंद्रात आणण्यात आले तेव्हा उपस्थित परिचारिकेने उपचार करण्याऐवजी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या कर्मचार्‍यांकडे प्रसूती करण्याचा  अनुभव नव्हता तसेच त्यांनी संबंधित महिलेचा प्रकृती गंभीर असल्याचे सांगून ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका बंद पडली. बंद रुग्णवाहिकेत कविताची प्रसूती झाली होती.


महिलेची प्रकृती एवढी गंभीर होती तर रुग्णवाहिकेतून आरोग्य खात्याचे कर्मचारी बरोबर का गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रुग्णवाहिका बंद पडल्याने दुसरे वाहन मागवून कविताला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. या सार्‍या प्रवासात कविता राऊत यांचा मृत्यू झाला होता. एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देणे म्हणजे आपली जबाबदारी टाळण्याचा प्रकार होता, असे ताशेरे मानवी हक्क आयोगाने ओढले. 


‘’रुग्णवाहिका बंद पडली नसती तर माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता’’


‘’माझ्या गर्भवती पत्नीला पिंपळखुटा येथून मोलगीकडे रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना सुरगस गावाजवळ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे बंद पडली. तेथेच माझ्या पत्नीने मुलाला जन्म दिला. मात्र, तिची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन जाणे गरजेचे होते. संबंधित रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे दुसरी रुग्णवाहिका मोलगी येथून मागविण्यात आली. पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे घेऊन गेले असता नंदुरबार येथे माझ्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर रुग्णवाहिका बंद पडली नसती तर माझ्या पत्नीचा जीव वाचू शकला असता. संबंधित कामचुकार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी,’’

अशी मागणी त्यावेळी मृत महिलेच्या पतीने मगन राऊत यांनी केली होती.


User Imageमगन राऊत


निर्विकार, निष्ठुर, निर्जीवतेचे दर्शन घडविणारा घटनाक्रम


नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील बर्डी येथील कविता राऊत (२३) या गर्भवतीला रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र रस्त्यातच रुग्णवाहिका बंद पडली. या महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेल्या कविताला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय अशा तीन तास फेर्‍या माराव्या लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिचे बाळ मात्र वाचले. सरकारी आरोग्य व्यवस्थेतील बथ्थड, निर्विकार, निष्ठुर, निर्जीवतेचे दर्शन घडविणारा हा सारा घटनाक्रम. वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेचा  बळी गेला. 


राज्य शासनाची रुग्णवाहिका हा प्रकार घडला त्याआधी सहा महिने बंद होती. कारण दुरुस्ती व देखभालीसाठी निधीच उपलब्ध झाला नव्हता. आरोग्य खात्याची उदासीनता, निष्काळजी, रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसणे, उपस्थित कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नसणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे यावरून मानवी हक्क आयोगाने आरोग्य खात्याची कानउघाडणी केली आहे.


  • नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातून प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असलेल्या गर्भवतीचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. 
  • प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या त्या वृत्ताच्या आधारे डॉ. सुमीर डेंबला यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. मानवी हक्क आयोगाने यावर सविस्तर सुनावणी करून निकाल दिला आहे.


User Imageबंद पडलेली रुग्णवाहिका


घटना आहे दोन वर्षांपूर्वीची, 15 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेली… जवळपास सगळ्याच माध्यमांनी या घटनेची दखल घेतली होती. झालं असं होतं की, नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या बर्डी येथील गर्भवती मातेला मोलगी येथे नेत असताना अचानक रुग्णवाहिका नादुरुस्त झाली अन् मातेची बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.


तिने गोंडस बाळाला जन्म दिला. त्याने या जगात पहिला श्वास घेतला अन् क्षणातच मातेची प्रकृती खालावली. तासभर रुग्णवाहिका सुरु न झाल्याने पर्यायी वाहनाने जिल्हा रुग्णालयात नेले असता तिने अखेरचा श्वास घेतला. क्षणभरापूर्वी जन्माला आलेलं निष्पाप, गोंडस बाळ पोरकं झालं.


हे प्रकरण चांगलंच गाजलं. आरोग्य खात्याची उदासीनता, निष्काळजीपणा, रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसणे, उपस्थित कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नसणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे यावरून गदारोळ उडाला होता. 


आता दोन वर्षांनंतर ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातून प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असलेल्या गर्भवतीचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या त्या वृत्ताच्या आधारे डॉ. सुमीर डेंबला यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. मानवी हक्क आयोगाने यावर सविस्तर सुनावणी करून निकाल दिला आहे.

Share this article
चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. खनिज संपत्तीच्या उत्खननासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे आदिवासी जीवन, जैवविविधता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. चंद्रपूरमधील प्रदूषण आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा अनुभव गडचिरोलीसमोर इशारा म्हणून उभा आहे. वाघांचे कॉरिडॉर खंडित होत असताना जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांचे अस्तित्वही संकटात सापडत आहे.

5 min read
B
Bandu Dhotre
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...