Skip to main content

सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण: 'सक्षमचा धाकटा भाऊ गैरवर्तन करत होता' - आंचल मामीडवारचा गंभीर आरोप

Team BaiManus
Today
3 min read
3 views
सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण: 'सक्षमचा धाकटा भाऊ गैरवर्तन करत होता' - आंचल मामीडवारचा गंभीर आरोप

टीम बाईमाणूस  


  • सहा महिन्यांपूर्वी नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले होते. प्रियकराच्या हत्येनंतर आंचल मामीडवारने मृतदेहाशी विवाह करत देशभरात चर्चेचा विषय निर्माण केला होता.


  • मात्र आता आंचल स्वतः समोर आली असून, सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत होता, असा गंभीर आरोप तिने केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.


नांदेडमध्ये सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. सक्षमच्या घरातून आंचल मामीडवार निघून गेल्यानंतर तिच्या निर्णयाबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान आंचलची बाजू समोर आली नव्हती. आता प्रथमच माध्यमांसमोर येत तिने घर सोडण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.


काही दिवसांपूर्वी सक्षमची आई संगीता ताटे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आंचल अचानक घर सोडून गेल्याचा दावा केला होता. सक्षमच्या मृत्यूनंतर आंचलने "आता मीच तुमचा मुलगा आहे, तुमची काळजी घेईन," असं सांगितलं होतं. ती काही महिने कुटुंबासोबत राहिली. मात्र, आजीची तब्येत बिघडल्याचं कारण सांगून ती गेली आणि त्यानंतर परत आली नाही, असं संगीता ताटे यांनी म्हटलं होतं.


या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आंचलच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. काहींनी तिच्यावर टीका केली, तर काहींनी तिची बाजू ऐकून घेण्याची मागणी केली. अखेर या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना आंचलने वेगळाच दावा केला आहे.


User Image

“माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही”


एबीपी माझाच्या वृत्तानुसार, "माध्यमांशी बोलताना आंचल मामीडवारने सक्षमचा धाकटा भाऊ आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप केला. ही बाब आपण सक्षमच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवला गेला नाही", असं तिने सांगितलं.


"पुढे काही अनुचित घडलं तरी माझ्यावर विश्वास ठेवला जाणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे मी सर्वांना सांगून आणि पोलिसांना माहिती देऊन ते घर सोडलं. पोलिस कर्मचाऱ्यांनी मला माझ्या वडिलांच्या घरी पोहोचवलं," असा दावा आंचलने केला आहे. सध्या आपण वडिलांच्या घरी राहत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.


आंचलने सक्षमच्या वडिलांच्या निधनाबाबतही प्रतिक्रिया दिली. त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचं तिने सांगितलं. तसेच, आपण घर सोडल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ट्रोलिंगबाबत नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्य जाणून न घेता एखाद्या व्यक्तीबाबत निष्कर्ष काढू नयेत, असं आवाहनही तिने केलं आहे.


दरम्यान, या नव्या खुलास्यामुळे सक्षम ताटे प्रकरणात चर्चेचं केंद्र बदललं आहे. आतापर्यंत आंचलने घर का सोडलं, यावर चर्चा होत होती. मात्र, आता तिने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांमुळे नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. या आरोपांवर सक्षमच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय असेल, तसेच पुढे याबाबत कोणती भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Share this article
माझ्या वडिलांना कुठे नेताय? लेकीची गाडीसमोर धाव.. निष्पाप  शिक्षकाचा पोलीस-वाळूमाफियाकडून अमानुष अंत
ताज्या घडामोडी

माझ्या वडिलांना कुठे नेताय? लेकीची गाडीसमोर धाव.. निष्पाप शिक्षकाचा पोलीस-वाळूमाफियाकडून अमानुष अंत

A shocking incident in Sangli has raised serious concerns about law and order in Maharashtra after 14-year-old Vedant Bandgar was shot dead inside his home in Abhaynagar. The attackers allegedly entered the residence intending to target local leader Balasaheb Bandgar, but opened fire on the teenager when they failed to find him. The tragedy has reignited debate over rising organized crime, easy access to illegal firearms, and the effectiveness of policing in the state. As investigations continue, the case has become a symbol of growing public anxiety about safety, especially for children and families caught in the crossfire of criminal rivalries.

3 min read
V
Vitthal Sable
सांगलीमध्ये 14 वर्षीय वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाची गोळ्या झाडून हत्या…
ताज्या घडामोडी

सांगलीमध्ये 14 वर्षीय वेदांत बंडगर या अल्पवयीन मुलाची गोळ्या झाडून हत्या…

शहरातील अभयनगर येथील भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं ठार झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. वेदांत हा माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू होता. व्यावसायिक वादातून हल्लेखोरांनी बंडगर यांच्या घरामध्ये घुसून हा हल्ला केल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

5 min read
T
Team BaiManus
 ‘बंदर’ : खोट्या आरोपांची कहाणी की अनुराग कश्यपची वैचारिक अस्वस्थता?
ताज्या घडामोडी

‘बंदर’ : खोट्या आरोपांची कहाणी की अनुराग कश्यपची वैचारिक अस्वस्थता?

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच एक जुनी पण अस्वस्थ करणारी चर्चा पुन्हा ऐरणीवर आणली आहे ती म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमधील सत्य, खोटे आरोप आणि न्यायव्यवस्थेची भूमिका. बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून हा चित्रपट एका आरोपानंतर उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याची कथा सांगतो. त्यामुळे अनेकांनी हा चित्रपट कलम ३७६ च्या कथित गैरवापरावर भाष्य करणारा म्हणून पाहिले आहे. मात्र ‘बंदर’ केवळ एका खोट्या आरोपाची कथा आहे का, की तो #MeToo नंतरच्या भारतातील वैचारिक संघर्ष, न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक शिक्षेच्या संस्कृतीवर भाष्य करणारा चित्रपट आहे? या प्रश्नाचा मागोवा.

8 min read
S
Suraj Patke
जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?
ताज्या घडामोडी

जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?

नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणानंतर मृत प्रियकराशी विवाह करणारी आंचल मामीडवार देशभर चर्चेत आली होती. मात्र काही महिन्यांनी तिने सक्षमचे घर सोडल्यानंतर तिच्याविरोधात सार्वजनिक न्यायनिवाडा सुरू झाला. आंचलच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, माध्यमांच्या भूमिकेचा आणि ऑनर किलिंगच्या मूळ प्रश्नाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट.

5 min read
S
Sanjana Khandare
‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त
ताज्या घडामोडी

‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त

समाजातील पुरुषप्रधान मानसिकता बदलेपर्यंत 'पीसीपीएनडीटी' कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी. आजही समाजात पडद्यामागे छुप्या पद्धतीने लिंगनिदानासारखे बेकायदेशीर प्रकार सुरू. जोपर्यंत लोकांच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात संपूर्ण बदल होत नाही, तोपर्यंत स्त्री-भ्रूणहत्या रोखणाऱ्या या कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

2 min read
T
Team BaiManus
आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार
ताज्या घडामोडी

आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

नीट व सीबीएसई पेपरफुटीमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तीव्र आंदोलन. - सरकार चर्चा करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना बदनाम करून तरुणांचा आवाज दाबत आहे. - हे आंदोलन गांधी आंबेडकरांच्या अहिंसक विचारांवर असून, पुण्यानंतर नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही आंदोलन केले जाईल.

3 min read
A
Apsara Aga

Comments

Comments are currently disabled or loading...