Skip to main content

रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....

Article in Marathi
Vitthal Sable
24 Dec 2025
4 min read
14 views
रोशन कुडे किडनी प्रकरणातून समोर आले आंतरराष्ट्रीय रॅकेट; 
          आतापर्यंत 12 जणांची किडनी विक्री....

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात रोशन कुडे याच्या किडनी विक्री प्रकरणाने केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. या प्रकरणाच्या तपासात किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले असून, एसआयटीने सोलापूर येथून अटक केलेला डॉ. कृष्णा उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू हा या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असल्याची माहिती समोर आली आहे. एका किडनीमागे एक लाख रुपयांचे कमिशन मिळत असल्याने तो गरजू व आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना हेरून किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रामकृष्ण हा मूळचा उच्चशिक्षित आहे. सन 2015 मध्ये व्यवसायात अपयश आल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला. याच काळात फेसबुकवरील ‘किडनी डोनर’ या ग्रुपच्या माध्यमातून तो किडनी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संपर्कात आला. या ग्रुपमधील एका एजंटशी संपर्क वाढल्यानंतर 2018 मध्ये तो कोलकाता येथे त्या एजंटला भेटायला गेला. यानंतर त्या एजंटनेच त्याला कंबोडिया येथे नेले. कंबोडिया येथील 'प्रेआ केत मेलिआ' हॉस्पिटल, फ्नॉम पेन्ह (मिलिटरी हॉस्पिटल) येथे रामकृष्णने स्वतःचीही एक किडनी विकल्याचे तपासात समोर आले आहे. किडनी विक्रीनंतर मिळालेल्या पैशामुळे तो या रॅकेटचा कायमस्वरूपी भाग बनला. त्यानंतर त्याने ‘डॉ. कृष्णा’ या नावाने एजंट म्हणून काम सुरू केले.



एसआयटीच्या माहितीनुसार, डॉ. कृष्णा प्रत्येक किडनी विक्रीमागे सुमारे एक लाख रुपयांचे कमिशन घेत असे. आर्थिक संकटात असलेले, कर्जबाजारी किंवा बेरोजगार तरुण यांना तो गाठत असे. भारतातून अशा व्यक्तींना कंबोडियाला नेऊन त्यांची किडनी काढण्यात येत होती. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून किमान 12 भारतीय नागरिकांनी कंबोडियामध्ये किडनी विकल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे आहे नेमकं प्रकरण...

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन सदाशिव कुडे यांनी शेतीला पूरक उत्पन्न मिळावे म्हणून काही वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय सुरू केला. यासाठी त्यांनी दोन खासगी सावकारांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. सुरुवातीला व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र गाई आजारी पडून मृत्युमुखी पडल्या, पशुवैद्यकीय खर्च वाढला आणि दूध उत्पादन पूर्णपणे बंद झाले. शेतीतूनही पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने कर्जफेड अशक्य होत गेली.

सावकारांकडून दरमहा 10 ते 20 टक्के दराने बेकायदेशीर व्याज आकारले जात असल्याचा आरोप रोशन कुडे यांनी केला आहे. व्याजावर व्याज, दंड आणि इतर खर्चामुळे मूळ एक लाखांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी शेतीचा काही भाग, ट्रॅक्टर व घरातील मौल्यवान वस्तू विकल्या, तरीही कर्ज कमी झाले नाही.



असह्य मानसिक दबावामुळे सावकारांच्या सांगण्यावरून किडनी विकण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कंबोडिया येथे शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली असून त्याबदल्यात मिळालेले सुमारे आठ लाख रुपये कर्जफेडीसाठी वापरले गेले.

पोलिसांनी पैशांचा मागोवा घेतला

या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे रोशन कुडे याला किडनी विक्रीपोटी मिळालेले आठ लाख रुपये. कंबोडियात शस्त्रक्रिया सुरू असतानाच हे पैसे भारतीय बँक खात्यातून रोशनच्या खात्यात जमा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे पैसे ज्या भारतीय बँक खात्यातून वळते करण्यात आले, ते खाते नेमके कुणाचे आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या आर्थिक व्यवहारातून आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोलकात्यातील एजंट लवकरच गजाआड..

डॉ. कृष्णाला कोलकात्यात भेटलेला मुख्य एजंट हा या रॅकेटचा कळीचा सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांना आहे. या एजंटविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.



तक्रार मागे घेण्यासाठी ‘एक कोटींची’ ऑफर?

या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले असून, ज्या दिवशी रोशन कुडे याच्या किडनी विक्रीची चर्चा समोर आली, त्याच दिवशी नागभीड तालुक्यातील आरोपी सावकारांनी त्याला तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या बाबतही पोलिसांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे किडनी तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट झाले आहे. एसआयटीकडून तपासाचा आवाका वाढवण्यात येत असून, आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरीब व गरजू नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेणाऱ्या या रॅकेटवर कडक कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...