Skip to main content

‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त

Article in Marathi
Team BaiManus
Today
2 views
‘मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर सुप्रीम कोर्टाकडून तीव्र चिंता व्यक्त

टीम बाईमाणूस


  • समाजातील पुरुषप्रधान मानसिकता बदलेपर्यंत 'पीसीपीएनडीटी' कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी.


  • आजही समाजात पडद्यामागे छुप्या पद्धतीने लिंगनिदानासारखे बेकायदेशीर प्रकार सुरू. जोपर्यंत लोकांच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात संपूर्ण बदल होत नाही, तोपर्यंत स्त्री-भ्रूणहत्या रोखणाऱ्या या कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


सर्वोच्च न्यायालयाने 'मुलगाच हवा' या समाजाच्या अट्टाहासावर तीव्र चिंता व्यक्त करत, 'गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्याची' (पीसीपीएनडीटी ॲक्ट) काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समाजातील खोलवर रुजलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेवर तीव्र चिंता व्यक्त केली. आजही समाजात पडद्यामागे छुप्या पद्धतीने लिंगनिदानासारखे बेकायदेशीर प्रकार सुरू असून, जोपर्यंत लोकांच्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात संपूर्ण बदल होत नाही, तोपर्यंत स्त्री-भ्रूणहत्या रोखणाऱ्या या कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


या सुनावणीदरम्यान खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध कल्याणकारी योजनांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या सकारात्मक परिणामांची दखल घेतली. 'बेटी बचाओ बेटी पढाओ', 'जननी सुरक्षा योजना' आणि 'लाडली लक्ष्मी योजना' यांसारख्या उपक्रमांमधून मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यावरील पद्धतशीर भेदभाव नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, हे न्यायालयाने मान्य केले. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलींच्या शिक्षणासाठी, सुरक्षेसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आजही शहरांमध्ये बसेस आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे पोस्टर्स लावावे लागतात, ही बाब समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेची आणि स्त्रीला 'कमकुवत' समजण्याच्या प्रवृत्तीची साक्ष देते, असे परखड मत न्यायालयाने नोंदवले. 


User Image


मनुस्मृतीतील श्लोकाचा दाखला


महाराष्ट्रातील नांदेडमधील डॉ. रमेश महादू बोले यांनी 'पीसीपीएनडीटी' कायद्याच्या उल्लंघनाबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याला आव्हान देणारे अपील सर्वोच्च न्यायालयात केले होते, ते फेटाळून लावताना न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. या निकालात स्त्री-सन्मानाचे महत्त्व विशद करताना न्यायालयाने मनुस्मृतीतील 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' (जिथे स्त्रियांची पूजा होते, तिथे देवता वास करतात) या श्लोकाचा आणि सुभद्रा कुमारी चौहान यांच्या 'बालिका का परिचय' या मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करणाऱ्या कवितेचाही अत्यंत मार्मिक संदर्भ दिला. देशातील लिंग गुणोत्तराच्या माहितीत सुधारणा दिसत असली तरी, जोपर्यंत मुलगी जन्माला येण्याबाबत समाजाच्या मनात असलेला प्रश्न कायमचा मिटत नाही, तोपर्यंत अशा कल्याणकारी कायद्यांचे अस्तित्व आणि प्रभावी अंमलबजावणी अनिवार्य राहील, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.


नांदेडच्या डॉक्टरचे अपील फेटाळले


बोले हॉस्पिटल (सोनोग्राफी सेंटर), अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील डॉ. रमेश महादू बोले यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मार्च २०१६ मध्ये नांदेडच्या 'सिव्हिल सर्जन' यांनी अर्धापूर येथील त्यांच्या सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली होती, ज्यात 'एफ' फॉर्म  आणि इतर नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यामुळे त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईला आव्हान देणारी त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.


Share this article
जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?
ताज्या घडामोडी

जिच्या प्रेमाला सलाम केला, तिच्याच निर्णयावर समाजाचा खटला… ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या ‘सक्षम’ची ‘आंचल’ आज आरोपीच्या पिंजऱ्यात का?

नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणानंतर मृत प्रियकराशी विवाह करणारी आंचल मामीडवार देशभर चर्चेत आली होती. मात्र काही महिन्यांनी तिने सक्षमचे घर सोडल्यानंतर तिच्याविरोधात सार्वजनिक न्यायनिवाडा सुरू झाला. आंचलच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचा, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, माध्यमांच्या भूमिकेचा आणि ऑनर किलिंगच्या मूळ प्रश्नाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट.

5 min read
S
Sanjana Khandare
आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार
ताज्या घडामोडी

आम्हाला फेक म्हणू नका, तरुणांचे म्हणणे ऐका; अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार

नीट व सीबीएसई पेपरफुटीमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात तीव्र आंदोलन. - सरकार चर्चा करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना बदनाम करून तरुणांचा आवाज दाबत आहे. - हे आंदोलन गांधी आंबेडकरांच्या अहिंसक विचारांवर असून, पुण्यानंतर नागपूर, लखनौ आणि बेंगळुरू येथेही आंदोलन केले जाईल.

3 min read
A
Apsara Aga
सर्वोच्च न्यायालय म्हणते, ‘गृहिणी’ या शब्दाला ‘राष्ट्रनिर्मात्या’ असा दर्जा मिळायला हवा
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, ‘गृहिणी’ या शब्दाला ‘राष्ट्रनिर्मात्या’ असा दर्जा मिळायला हवा

In a significant judgment, the Supreme Court of India has emphasized the economic and social value of unpaid domestic work performed by homemakers. The court ruled that their contribution should be assessed at a minimum of ₹30,000 per month when calculating compensation in motor accident claims.

3 min read
T
Team BaiManus
कंगना म्हणते तसं, आपल्याकडे नर्सेसना लैंगिक नजरेनं पाहिलं जातं का? देशभरातून परिचारिकांचा  संताप
ताज्या घडामोडी

कंगना म्हणते तसं, आपल्याकडे नर्सेसना लैंगिक नजरेनं पाहिलं जातं का? देशभरातून परिचारिकांचा संताप

- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जीव धोक्यात घालून गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचवणाऱ्या कामा हॉस्पिटलच्या शूर परिचारिकांच्या कथेला 'भारत भाग्य विधाता' चित्रपटातून पडद्यावर आणले जात आहे. - 'नर्सिंग हा सर्वाधिक सेक्स्युअलाइज्ड व्यवसाय आहे' आणि 'नर्सेसचा युनिफॉर्म अजूनही ब्रिटिशकालीन मानसिकतेचा वारसा आहे' या कंगना रणौतच्या विधानांमुळे देशभरातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या आहेत. - सेवा, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या नर्सिंग व्यवसायाकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो? कंगना रणौतच्या एका विधानामुळे सुरू झालेल्या वादाने नर्सेसची सुरक्षा, सन्मान, कामाच्या अटी आणि समाजातील प्रतिमा या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना पुन्हा ऐरणीवर आणले आहे.

5 min read
V
Vitthal Sable
ॲसिडनं चेहरा जळाला, पण जिद्द नाही! ओडिसातील हल्लाग्रस्त माननीचा थक्क करणारा प्रवास
ताज्या घडामोडी

ॲसिडनं चेहरा जळाला, पण जिद्द नाही! ओडिसातील हल्लाग्रस्त माननीचा थक्क करणारा प्रवास

अवघ्या १६ व्या वर्षी लग्नाला नकार दिला म्हणून गावातल्या एका विवाहित मुलानं माननीच्या अंगावर ॲसिड ओतलं. नऊ शस्त्रक्रिया होऊनही समाजानं स्वीकारलं नाही. पण राज्यात नोकरीसाठी धावपळ केली. 'छांव फाउंडेशन' आणि 'शेरोज हँगआउट' कॅफेच्या माध्यमातून ती आणि अशा ॲसिड हल्लाग्रस्त मुली आता स्वाभिमानानं काम करत आहेत.

7 min read
A
Apsara Aga
सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…

लग्नाआधीचे सहमतीने प्रस्थापित केलेले संबंध हा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरील डाग मानला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बदलत्या सामाजिक नियमांबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. खंडपीठाने म्हटले की, विवाहपूर्व संबंधांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना बदलत्या काळाची संवेदनशीलता समजून घ्यावी लागेल.

3 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...