संजना खंडारे
- २०१६ मध्ये घडलेल्या उना दलित मारहाण प्रकरणात तब्बल दहा वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. ४२ आरोपींपैकी ३८ जणांना निर्दोष मुक्त केले असून ५ जणांना दोषी ठरवले आहे.
- उनात घडलेल्या या घटनेनं देशव्यापी दलित चळवळीला गती मिळाली. या घटनेमुळे नाराज झालेल्या गुजरातमधील शेकडो दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
11 जुलै 2016 रोजी गुजरातच्या उना येथील मोटा समाधियाला गावात मृत गायीचे कातडे काढणाऱ्या सात दलितांना गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या काही लोकांनी जबर मारहाण केली. त्यांना वाहनाच्या मागील बाजूला बांधून रस्त्यावरून ओढत पोलिस ठाण्यात नेले. तिथे जमावाने मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल झाला, आंदोलन झाले, मोठ-मोठे नेते गावात आले आणि 43 आरोपी तुरुंगात गेले. 35 आरोपी जामिनावर बाहेर आले आणि यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी संध्याकाळी पुन्हा 2 पीडितांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना पुन्हा कारागृहात पाठवले…
25 जुलै 2022 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने 4 आरोपींना जामीन दिला. त्यानंतर दोन आरोपी पीडितांकडे गेले. केस मागे घेण्याच्या धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ केली. पीडितांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले…
१० वर्षानंतर मिळाला न्याय, दोषींना पाच वर्षांची शिक्षा
मात्र आता या प्रकरणावर पडदा पडलाय. २०१६ मध्ये घडलेल्या उना दलित मारहाण प्रकरणात तब्बल दहा वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. गुजरातमधील गिर सोमनाथ सेशन कोर्टाने ४२ आरोपींपैकी ३८ जणांना निर्दोष मुक्त केले असून ५ जणांना दोषी ठरवले आहे. मंगळवार (१७ मार्च २०२६) रोजी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आरोपींना प्रत्येकी ५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. याआधी सोमवारी (१६ मार्च) न्यायालयाने रमेश जादव, राकेश जोशी, नागजीभाई वणिया, प्रमोदगिरी गोस्वामी आणि बलवंतगिरी गोस्वामी यांना दोषी ठरवले होते. तर तत्कालीन पोलिस निरीक्षक निर्मल सिंह झाला यांच्यासह ४ पोलिस कर्मचारी आणि इतर आरोपी मिळून एकूण ३५ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
11 जुलै 2016 रोजी गुजरातच्या उना येथील मोटा समाधियाला गावात मृत गायीचे कातडे काढणाऱ्या सात दलितांना गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या काही लोकांनी जबर मारहाण केली.
दोषी ठरवलेल्या ५ जणांना IPC कलम ३२३ (मारहाण), ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३२४ (हत्याराने हल्ला) आणि ५०६ (२) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्यावर SC/ST कायद्याच्या कलमांचाही समावेश आहे. इतर आरोपींना पुरावे अपुरे असल्यामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले.
न्यायालयाच्या निकालावर पीडितांनी नाराजी व्यक्त केली
या प्रकरणातील तक्रारदार वश्राम सरवैया यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला 'दुर्दैवी' असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ते या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहेत. उना पीडितांच्या पाठिंब्याकरता आयोजित केलेल्या रॅलीमुळे जिग्नेश मेवाणी हे नाव त्यावेळी देशभर पोहोचलं होत. न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतावा वडगावचे आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले की, या निकालामुळे आम्ही सगळेच नाराज आहोत.
सरकारने त्यावेळी पीडितांना शेतजमीन आणि नोकरीचे आश्वासन दिले होते, परंतू त्यापैकीच कसलीच पुर्तता झाली नाही. न्यायालयाने या प्रकरणातील तब्बल ३८आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरात सरकारला जर खरोखरच पीडितांना न्याय मिळवून देण्याची इच्छा असती तर त्यांनी वकीलांची तगडी फौज उभी करायला हवी होती.
या प्रकरणातील तक्रारदार वश्राम सरवैया मारहाणीची जागा दाखवताना.
अदालत के फैसले के बाद पीड़ित और शिकायतकर्ता वशराम सरवैया ने इस निर्णय को "दुखद" बताया और कहा: "हम इसे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट तक चुनौती देंगे।" वडगाम के विधायक जिग्नेश मेवानी ने भी अदालत के निर्णय पर दुःख जाहिर किया और बोले कि पीड़ितों को ना तो सरकार से खेती की जमीन औरनौकरी मिली ना ही अदालत से न्याय।
नेमकं काय घडलं होतं उनामध्ये…?
ज्या सात दलितांना मोटा समाधियाला गावात गोरक्षकांनी जबर मारहाण करून धिंड काढली होती त्यापैकी वश्राम सरवैय्या, त्यांचे भाऊ रमेश,चुलत भाऊ बेचर आणि अशोक सरवैय्या यांनी न्यायालयात हे प्रकरण लावून धरले होते. हे कुटुंब गावाजवळच मृत पडलेल्या गायीचे कातडे काढून विकण्याचे काम करायचे. कथित गोरक्षकांनी भर रस्त्यात विवस्त्र करून त्यांना निर्दयीपणे मारहाण केली. केवळ मारहाणीने हल्लेखोरांचे मन भरले नाही. त्यांनी या लोकांना गाडीच्या मागच्या बाजूला बांधून ओढतच उना येथील पोलीस ठाण्यात नेले. उनामध्ये जमाव जमला आणि सुमारे 45 लोकांनी त्यांना मारहाण केली. त्या दिवसाची आठवण सांगताना वश्राम आजही घाबरलेले दिसतात.
"देशातल्या दलित चळवळीची ज्या शहरातून मुहुर्तमेढ रोवण्यात आली त्याच ऐतिहासिक उना शहरात दलितांना अपमानित करण्यात यावं हे अत्यंत दुर्देवी आहे. आम्ही गाईचे कातडे काढण्याचे काम बंद केले आहे. पूर्वी आम्हाला वाटायचं की हे आमचे काम आहे, पण आता कळलं की, ते आमचं काम नाही. आता आम्ही आमच्या मुलांना हे करायला लावणार नाही, तर त्यांना शिक्षण देऊ.’’ असं वश्राम सरवैय्या सांगतात.
‘’मारहाणीने मन भरलं नाही, म्हणून विवस्त्र करू धिंड काढली’’
अशोक सरवैया यांनी तो प्रसंग कथन केला. पीडितांपैकी अशोक वयाने सगळ्यात लहान आहेत. ते सांगतात, "मला आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो. ते पुन्हा येतील आणि आम्हाला झोडपून काढतील".
या घटनेमुळे नाराज झालेल्या गुजरातमधील शेकडो दलितांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
‘’2016 मध्ये हे प्रकरण घडले तेव्हा राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल घरी आले होते. सर्वांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. आनंदीबेन म्हणाल्या होत्या की मी महिनाभरानंतर पुन्हा येईन आणि मदत मिळाली की नाही ते बघेन, पण आम्हाला फक्त आश्वासने मिळाली’’ अशी खंत वश्राम सरवैय्या बोलून दाखवतात.
गुजरात सरकारने त्यावेळी म्हटले होते की, पीडितांना जमीन आणि रोजगार दिला जाईल. पण तेही मिळाले नाही. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आम्हाला प्रत्येकी तीन लाख रुपयेच मिळाले आहेत. ते धनादेश घटनेनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मिळाले. तेव्हापासून कोणीही मदत केली नाही आणि वळूनही पाहिले नाही, वश्राम सरवैय्या पुढे सांगतात.
बौद्ध धर्म स्वीकारला, होळी-दिवाळी साजरी करणे बंद केले
उनात घडलेल्या या घटनेनं देशव्यापी दलित चळवळीला गती मिळाली. या घटनेच्या निषेधार्थ गुजरात आणि देशभरातही आंदोलनं झाली होती. उनामधील घटनेमुळे तिथल्या दलितांच्या मनात मोठा राग निर्माण झाला होता, त्यामुळेच या घटनेतील पीडितांनीही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला होता. या मारहाणीच्या घटनेनंतर गुजरातच्या दलितांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. त्यांचा राग अनावर झाला आणि राज्यात जागोजागी निदर्शनं झाली. या घटनेमुळे नाराज झालेल्या अनेकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
उना पीडितांनी आधीच सांगितलं होतं की ते आपला धर्म बदलणार आहेत. त्यांचा आरोप होता की हिंदू धर्मात त्यांना सातत्यानं भेदभावाला सामोरं जावं लागत आहे. तसंच, सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही, असं देखील त्यांचं म्हणणं होतं.
उनाच्या घटनेनंतर दलितांनी मेलेल्या जनावरांचे कातडे काढण्याचे काम सोडून दिले. त्यामुळे आता गावकरी मेलेली जनावरे तशीच फेकून देतात.
वश्राम यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हिंदू धर्म सोडून 2018 मध्येच बौद्ध धर्म स्वीकारला. उनामध्ये सुमारे 300 लोकांनी हिंदू धर्म सोडला. वश्राम म्हणतात, गेल्या 8 वर्षांपासून आम्ही होळी-दिवाळी साजरी करणे बंद केले आहे. आता आम्ही दोनच सण साजरे करतो. पहिला 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि दुसरा बुद्ध पौर्णिमा. बौद्ध धर्म जागतिक धर्म आहे. उना प्रसंगानंतर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कारणं लोक समजून घेतील. हिंदू धर्म आम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देऊ शकला नाही".
वश्राम पुढे सांगतात, त्या घटनेनंतर परिसरातील दलित तरुणांनी डॉ.बी.आर.आंबेडकर ग्रुपची स्थापना केली आहे. गावाच्या मधोमध एक अंगणवाडी आहे, त्याच्या समोर सरकारी जागा रिकामी आहे. तिथे बाबासाहेबांच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी आंबेडकर भवन बांधण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक आमदारांशी बोलणी झाली असून, लवकरच ते याची परवानगी मिळवून देतील.
"प्रत्येक गावाबाहेर कातडी कमावण्यासाठी जागा मोकळी सोडण्यात आलेली असते. साधारणतः ही जागा दलितांच्या देखभाली खालीच असते. हे प्रकरण होण्यापूर्वी आम्ही तशाच जागी काम करत होतो. आता त्याच जागी आम्हाला बौद्ध मठ बांधायचा आहे. यासाठी आम्ही सरकारला अर्ज करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करू," असंही वश्राम सरवैया सांगतात.
ज्या जागेवर हल्ला झाला तिथे आज काय परिस्थिती आहे?
उना येथील मोटा समाधियाला गावात ज्या ठिकाणी दलितांवर हल्ला झाला होता तिथे आजही मेलेल्या गाई-म्हशी पडलेल्या दिसतात. दुर्गंधी इतकी तीव्र असते की तिथे क्षणभरही थांबणे कठीण होते. वश्राम म्हणतात की, उनाच्या घटनेनंतर दलितांनी मेलेल्या जनावरांचे कातडे काढण्याचे काम सोडून दिले. त्यामुळे आता गावकरी मेलेली जनावरे तशीच फेकून देतात. जमिनीत गाडण्याचे काम कोणी करत नाही. त्यासाठी जेसीबी मागवावा लागतो आणि मोठा खर्च करावा लागतो. पूर्वी सुद्धा लोक प्राणी असेच फेकायचे. आम्ही कातडे काढायचे आणि बाकीचा भाग पुरायचो. चामडे विकून आमचा उदरनिर्वाह चालायचा. आम्ही हे काम पूर्णपणे बंद केले आहे. आता या प्राण्यांचे मांस वन्य प्राणी थोडे थोडे खातात.
उना पीडितांच्या पाठिंब्याकरता आयोजित केलेल्या रॅलीमुळे जिग्नेश मेवाणी हे नाव त्यावेळी देशभर पोहोचलं होतं.
डॉ. आंबेडकरांनी योगदान दिलं नसतं तर देशातल्या दलितांना रस्त्यावरच्या कुत्र्यांप्रमाणे वागणूक मिळाली असती असं वश्रामच्या आई कुंवरबेन यांनी सांगितलं. त्यांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. कुंवरबेन या हिंदूधर्माच्या कट्टर समर्थक होत्या. दासमा देवीच्या पूजनासाठी त्या दरवर्षी दहा दिवस उपवास करायच्या. आयुष्यभर हिंदू देवदेवतांची पूजा करायची. उनामध्ये सत्संगाला नियमितपणे जायची. मात्र कुंवरबेन आता हिंदू धर्मावर चिडल्या आहेत. "आमचं आयुष्य भिकाऱ्यांप्रमाणे आहे. आम्हाला मूलभूत हक्कांपासूनही वंचित ठेवण्यात आलं आहे. आम्हाला माणूस म्हणून वागणूक देऊ न शकणाऱ्या धर्माचं पालन मी का करावं?" असा सवाल कुंवरबेन यांनी केला.
भेदभाव कमी झाला, आता बरोबरीत बसवलं जातं
ज्यांना गोरक्षकांनी मारहाण केली होती त्यापैकी रमेश आणि अशोक सरवैय्या म्हणतात, 2016 च्या घटनेनंतर गावातील दलित कुटुंबांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे. आता गावात त्यांच्याविरुद्धचा जातीभेद मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आम्हालाही गावात बरोबरीने बसवले जाते. ज्या ग्लासात कथित सवर्ण लोक पाणी पितात, ते आता आम्हालाही त्यातच पाणी द्यायला लागले आहेत. पूर्वी ते आम्हाला दुसऱ्या ग्लासात द्यायचे आणि स्वतः दुसऱ्या ग्लासात प्यायचे.
(संदर्भ - बीबीसी हिंदी आणि दै. भास्कर)






