Skip to main content

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

Article in Marathi
Apsara Aga
1 day ago
3 min read
2 views
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

 अप्सरा आगा

  • धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला.


  • वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले.


  • केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.




हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील महिलांना बसतो. त्यात मराठवाडा हा देशातील सर्वाधिक दुष्काळप्रवण भागांपैकी एक मानला जातो. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, याचा सर्वात मोठा फटका महिलांनाच बसतो. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे 'धाराशिव पंचायत परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये ३५ गावांतील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सगळ्यांनी मिळून एक वातावरणीय कृती आराखडा तयार करून तो सादर केला.


स्वयं शिक्षण प्रयोग, वातावरण, रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, पीडीएजी आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये स्थानिक पातळीवर हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सक्षम पूर्वतयारी आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात आला.


वाढत्या उष्णतेचा रोग्यावर आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा… 


परिषदेमध्ये वेगवेगळ्या भागांनुसार गट तयार करण्यात आले होते. हवामान बदलाचा कोणता त्रास होतो आणि त्यावर काय उपाय योजता येतील, यावर आपापल्या गटात चर्चा करून त्यांनी आपापल्या भागाचा एक कृती आराखडा तयार केला व तो सादर केला. हे आराखडे तक्त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. तसेच, हवामान बदलाला कोण जबाबदार आहे, हे नाटकांच्या माध्यमातून मांडण्यात आले. यावरच महिला थांबल्या नाहीत, तर आरोग्य, पाणी साठवणूक, दुष्काळ निवारण आणि हवामान बदल यावर स्थानिक पातळीवर कोणती धोरणे राबवता येतील, यावरही त्यांनी चर्चा केली. या परिषदेमध्ये महिला वाढत्या उष्णतेचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर, आरोग्यावर आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत भरभरून बोलत होत्या.


User Image

“वातावरण बदलाचा आमच्या आरोग्यावर लई परिणाम होतोय.”


धाराशिव जिल्ह्यातील कळंब गावच्या महिला चंद्रकला ठाकणे सांगतात, "हे जे वातावरण बदलतंय ना, त्याचा आमच्या आयुष्यावर लई (खूप) परिणाम झाला आहे. मी एक शेतकरी महिला आहे. आता जे वाढत चाललेलं ऊन आहे ना, त्याचा आमच्या आरोग्यावर लई परिणाम होतोय. काहीच काम करावंसं वाटत नाही. एवढं ऊन वाढलं आहे की सकाळी नऊनंतर घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही. आमच्या स्लॅबच्या घरात सुद्धा दम निघत नाही. या उष्णतेमुळे अंगावर घामोळ्या येणे, उन्हात पायाला फोड येणे आणि शेतात गेलं की जीव कासावीस होतोय. मळमळतंय, चक्कर आल्यासारखी होते. काय सांगू, आमचं कामच होत नाही. आम्ही कामच करू शकत नाही. कामच नाही केलं, तर घर चालवायला पैसे कुठून आणायचे? घर चालवणं अवघड होतंय."


"वातावरण बदलतंय, तसं आमचं आयुष्य पण बदलत चाललंय. आमच्यावर परिणाम होतोयच, पण आमच्या मुलांवरही परिणाम होतोय. आमच्या आईवडिलांच्या परिस्थितीमुळे आम्ही शिकलो नाही, पण आमची मुलं शिकावीत असं वाटतंय. पण या उन्हामुळं पीकच करपलं तर उत्पन्न मिळणार नाही. मग शिक्षणाला पैसे कुठून आणायचे? मुलांना तर खूप शिकवायचं असतं, पण आमची आर्थिक मजबुरी असते. मुलींच्या शिक्षणाचा तर विचार पण करत नाहीत. पालक म्हणतात, 'मुलाला कसं तरी शिकवलं, बस झालं. मुलीच्या शिक्षणाला कुठून पैसे आणायचे?'" त्यामुळे मुलींना शिक्षण मिळत नसल्याचे दुःख सारिका जाधव मांडत होत्या.


"मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याने झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याचा परिणाम जमिनीतील पाण्यावर होतोय, त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसं पाणीच मिळालं नाही, तर आमच्या आरोग्यावर परिणाम होतोय. वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या दहा वर्षांत तापमानात लई वाढ झालेली आहे, याचा परिणाम आमच्या शेतीवर झाला आहे. उन्हामुळे आम्हाला उलट्या होतात, त्यामुळे काम होत नाही. काम नाही झालं की मजुरी कमी मिळते. मजुरी मिळाली नाही की जगणं मुश्किल होतं," असे दुःख त्या व्यक्त करत होत्या.


परिषदेमध्ये हवामान बदलामुळे महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, यावर महिला भरभरून बोलत होत्या. याच पार्श्वभूमीवर वातावरण बदलाचे परिणाम आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात आला. कृती आराखड्यामध्ये महिलांनी गट शेती, सुनियोजित पीक पद्धती, मिश्र शेती आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांसाठी शासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तुषार आणि ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिल्यास गाव पातळीवरील स्थलांतर रोखणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.


User Image

स्वयं शिक्षण प्रयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमा शेख सांगतात, "आपल्याकडे मनुष्यबळ आणि संसाधनांची कमतरता नाही." तर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी बांधांवर वृक्षलागवड आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवून माती वाचवण्याचे आवाहन केले.


 'लिंगभाव - समावेशी दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचे प्रकाशन 


दोन दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये 'असर'तर्फे 'लिंगभाव - समावेशी दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाबाबत भारतातील वाढती असुरक्षितता या अहवालातून समोर आली आहे. या परिस्थितीत अधिक प्रभावी दुष्काळ पूर्वसूचना प्रणालीची गरज अधोरेखित होते. अशी प्रणाली दुष्काळाची पूर्वतयारी करण्यासाठी मोठा आधार ठरते. वेळेवर मिळणाऱ्या सूचनांमुळे शारीरिक श्रम कमी होण्यास मदत होते. उपजीविका, कुटुंब आणि समुदायाशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण पद्धतीने घेणे सोपे होते.


परिषदेमध्ये समुदाय पातळीवर पाण्याचा कार्यक्षम वापर आणि अल्पकालीन पिकांच्या अवलंबासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समिती स्थापन करण्याची गरज महिलांनी व्यक्त केली. शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपासून दूर जात स्प्रिंकलर (तुषार), ठिबक सिंचन आणि रेन पाईप यांसारख्या शाश्वत सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याच्या गरजेवर यावेळी भर देण्यात आला.


Share this article
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje
'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब
Video content
ग्राउंड रिपोर्ट

'BaiManus’चा महा इम्पॅक्ट: एका रिपोर्टने बदललं शिवरायांच्या रक्षकाच्या कुटुंबाचं नशीब

एकीकडे ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरू असताना, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणाऱ्या वीर जिवा महालेंच्या १४ व्या पिढीचं आयुष्य मात्र अत्यंत हालाखीत जात होतं. अंथरुणाला खिळलेले वडील, मजुरी करणारी आई आणि सलूनमध्ये काम करणारा मुलगा… ‘बाईमाणूस’ने हा उपेक्षित इतिहास महाराष्ट्रासमोर आणला आणि अवघ्या २४ तासांत संपूर्ण परिस्थिती बदलली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने मदतीचे आदेश दिले. वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे थेट साताऱ्यातील कोंढवली गावात पोहोचले. समाजातील संवेदनशील नागरिक आणि मुस्लिम मावळा सादिक शेख यांनीही सपकाळ कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.

V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...