Skip to main content

माणसाने माणसाला ओढून नेण्याची पद्धत तर बंद झाली, पण आता आयुष्याचा गाडा कसा हाकणार?

Apsara Aga
19 Nov 2025
2 views
माणसाने माणसाला ओढून नेण्याची पद्धत तर बंद झाली, पण आता आयुष्याचा गाडा कसा हाकणार?

- अप्सरा आगा

गेल्या वर्षी माथेरानमध्ये एक घटना घडली… परशुराम गोमा पिरकट हा 45 वर्षांचा आदिवासी हातरिक्षा चालक पर्यटकाला त्याच्या हातरिक्षामध्ये बसवून माथेरानच्या हॉटेलमध्ये जात होता. ‘वे साईड’ रिसॉर्टचा चढ चढून जेव्हा परशुरामने त्याची हातरिक्षा मेरिटाईम हाऊसपर्यंत खेचत आणली तेव्हा अचानक त्याला भोवळ आली आणि तो रिक्षा सोडून जमिनीवर कोसळला. इथर लोकांनी लगेचच परशुरामला ई-रिक्शामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. आपला चरितार्थ चालविण्यासाठी हा आदिवासी तरुण कैक वर्षांपासून हातरिक्षा ओढत होता. 

वाहनउद्योगात रोज नवी क्रांती घडत असताना माणसं माणसाला ओढत नेत असल्याची अमानवी प्रथा भारतात पश्चिम बंगालमध्ये कोलकाता आणि महाराष्ट्रात माथेरानमध्ये सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांचे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच निसर्गसौंदर्य अबाधित ठेवण्याच्या नावाखाली सुमारे १०० वर्षांपासून मानवी रिक्षाचा वापर केला जातो आहे. रिक्षात बसलेल्या व्यक्तीला तीन माणसे ओढत नेण्याच्या या प्रकाराला आजवर अनेकांनी विरोध केला आहे. मात्र माथेरानमधील घोडे व्यावसायिक आणि मूठभर निसर्गप्रेमींच्या अट्टहासामुळे मानवी रिक्षाला नवा पर्याय शोधण्याच्या प्रयत्नांना आता कुठे मुहुर्त मिळाला आहे.

apsara 1.jpg

माणसाने माणसाला ओढून नेण्याची ही पद्धत बंद व्हावी म्हणून

हिरव्यागार सौंदर्याने नटलेल्या माथेरानच्या या भूमीवर हातरिक्षा कामगारांच्या अमानवी कष्टाच्या पावलांचे ठसे खोल मातीत अगदी आतापर्यंत उमटले होते. मात्र आता ही अमानवी प्रथा कायमची संपुष्टात आली आहे. माथेरानच्या शांत कुशीत गेल्या कित्येक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या हातरिक्षा प्रथेवर अखेर कायमचे विरामचिन्ह लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेला अमानवीय आणि मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात ठरवत ती येत्या सहा महिन्यांत पूर्णतः बंद करण्याचा निर्णय दिला आहे. त्याऐवजी पर्यावरणपूरक ई-रिक्षा ही वापरण्याचा आदेशही देण्यात आला आहे.



संबंधित लेख वाचा:


1) आदिवासींमध्ये ना हुंडाबळी जातो ना मुलीचा बाप कर्जबाजारी होतो, मग ‘सुसंस्कृत’ कोण?


 

मात्र हा प्रश्न आणि त्यावरचे निवारण अद्यापही झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हातरिक्षावर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्यवसायच हातून जातोय, उद्याचं काय? हा प्रश्न घेऊन अनेक हातरिक्षा चालक चिंतेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

माथेरानमध्ये हातरिक्षा का सुरू झाली होती?

माथेरान… समुद्रसपाटीपासून 2625 फूट (300 मीटर ) उंचीवर असलेले एक थंड हवेचे ठिकाण. 1850 मध्ये ठाणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी हयूज पोईटस मलेट यांनी हे ठिकाण शोधले व तत्कालीन गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन यांनी ते पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. लोकसंख्या सुमारे पाच हजारपेक्षा अधिक. नेरळ रेल्वेस्टेशनपासून नऊ किलोमीटर अंतरावर असणारे हे पर्यटकांचे उन्हाळयातील खास पर्यटन स्थळ. 38 प्रेक्षणीय पॉईंटस असलेले व आशियातील एकमात्र स्वचंचलित वाहन मुक्त असलेले हे ठिकाण 1907 मध्ये येथे रेल्वे स्टेशन आरंजी वर्गीय यांनी सुरू केले. रस्त्याच्या एका बाजूला गर्द झाडी तर दुसऱ्या बाजूला दऱ्यांमुळे गाडी बसपर्यंत पोचण्यासाठी नागमोडी घाट पार करावा लागतो. वाहनतळापासून साधारणपणे एक ते दीड तासाचा रस्ता. 

apsara 2.jpg

मुख्य निवासस्थान हॉटेल किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी रोजचे साधन घोडे किंवा रिक्षा. रिक्षा म्हणजे इंधनावर चालणारी नाही तर माणसांकडून ओढली जाणारी. येथील पर्यटकांची सेवा हाच त्यांचा हंगामी व्यावसाय बनला आहे. माथेरान हिल स्टेशनवर ब्रिटीश काळापासून गाड्यांना परवानगी नसल्यामुळे, माथेरानमध्ये ये-जा करण्यासाठी लोकांना एकतर चालत जावं लागतं किंवा वाहतुकीसाठी 460 घोड्यांपैकी एकावर प्रवास करावा लागतो. इतकंच नाही तर इथे 94 हाताने ओढायच्या रिक्षांचा वापर करावा लागतो. 

अमानवी प्रथेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला?

माथेरानमध्ये स्थानिक 94 हातरिक्षा चालक - मालक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यातील 20 लोकांना ई- रिक्षा मिळाल्या आहेत. ई- रिक्षांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे कारण त्याचा तिकीट दर कमी आहे. त्यामुळे ई- रिक्षा वाढल्या पाहिजेत. जेणेकरून सर्वाना रोजगार मिळेल अशी, व्यावसायिकांची अपेक्षा आहे. माथेरानमध्ये येण्यासाठी तीन पर्याय इथले नागरिक आणि पर्यटकांसमोर उपलब्ध आहेत. 

एक म्हणजे ‘माथेरानची राणी’ असेलेली रेल्वे, दुसरं म्हणजे घोडे आणि तिसरा पर्याय म्हणजे हातरिक्षा. त्यातही रेल्वेमुळे तुम्ही फक्त माथेरान स्टेशनपर्यंत पोहोचू शकता. मात्र इथे फिरण्यासाठी, इथले टूरिस्ट स्पॉट पाहाण्याठी घोडे आणि हातरिक्षा हाच पर्याय आहे. माथेरानमधील पर्यटन वाढावे आणि हातरिक्षासारखी अमानवीय प्रथा बंद पडावी यासाठी ई रिक्षा हा पर्याय पुढे आला.

apsara 3.jpg

सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील पारंपरिक हातरिक्षा प्रथेवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर स्थानिक हातरिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. "हातरिक्षा बंद, आणि ई-रिक्षा सुरू'' म्हणजे आमचा उदरनिर्वाहच बंद होण्यासारखं आहे. आता आमच्या पोटापाण्याचं काय करायचं, हे सरकारनेच सांगावं," अशी भावना न्यायालयाच्या निर्णयाने थेट झळ पोहोचलेल्या हातरिक्षा श्रमिक वर्गातून व्यक्त होत आहे.

‘’ना हातरिक्षा आमच्या मालकीच्या होत्या, ना आता ई रिक्षा’’

हातरिक्षा चालवणारे विशाल जोगरे सांगतात, "मागील पाच-सहा वर्षांपासून मी माथेरानमध्ये हातरिक्षा चालवतो, पण ही रिक्षा आमची नाहीच…मालकाची आहे. आम्ही केवळ मजूर. दिवसभर कितीही श्रम केले, तरी त्यातून एक वाटा मालकालाच द्यावा लागतो," असं सांगताना त्या कामगाराच्या डोळ्यात भविष्यातील असुरक्षिततेची स्पष्ट झलक होती. "आत्ताच महागाईचा भार सहन होत नाहीये, त्यात जर ई-रिक्षा आल्या, तर आमचा धंदा आधीच्याच तुलनेत निम्मा होईल. प्रवासी थेट ई-रिक्षाने प्रवास करतील आणि आम्हाला कोणी विचारणार तरी का?" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भवितव्याबद्दलची चिंता व्यक्त केली.

विकास डोंगरे हे आणखी एक हातरिक्षा चालक सांगतात, "आम्ही आदिवासी आहोत. गेली वीस वर्षं माथेरानमध्ये हातरिक्षा चालवतो. काम केलं तरच घर चालतं. ई-रिक्षा आली, तेव्हा वाटलं होतं, आता आपल्यालाही काहीतरी रोजगार मिळेल. पण प्रत्यक्षात काय झालं? ज्यांच्या नावावर हातरिक्षा आहेत, त्यांनाच ई-रिक्षा मिळाल्या. आम्ही मजूर आहोत, आमचं नाव कुठेच नाही. न्यायालयाने फक्त सहा महिने यापुढे दिले आहेत, तोवर आम्ही हातरिक्षा चालवूच, पण सहा महिन्यांनंतर काय…? 

"आमच्या आजोबांपासून हातरिक्षाचा धंदा आहे. आता आमची तिसरी पिढी याच धंद्यात आहे," असं सांगताना अफजल डिंगळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. "सुरुवातीला पायथ्यापासून हिल स्टेशनपर्यंत फक्त दहा रुपये घेत होतो, ते आता पाचशे-सहाशेपर्यंत गेले. पण भाडं इतकं वाढूनही हातरिक्षाचा धंदा फारसा चालत नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे काहीजणांना ई-रिक्षा मिळाल्या. ती लोकं फक्त 70 रुपये भाडं घेतात घेतात, त्यामुळे पर्यटकांचं आकर्षण वाढलं आहे.

apsara 4.jpg

‘’हातरिक्षा ओढताना वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला’’

'आम्हाला दहावीनंतर शिक्षणच घेता आलं नाही.  कारण माथेरानवरून येण्या- जाण्यासाठी एसटी नव्हती. त्यामुळे कॉलेजपर्यंत जाताच आलं नाही.वडिलांनी हातरिक्षा चालवून आम्हाला मोठं केलं. शेवटी हातरिक्षा चालवून त्यांना दम लागायला त्यातच ह्रदयविकाराच्या झटक्याने 2016 ला वडील गेले. त्यामुळे वडिलांनी जे भोगलं आहे ते आमच्या वाट्याला नको. आता जो निर्णय आलाय त्याचे आम्हाला समाधान आहे. ई- रिक्षामुळे आमचं उत्पन्नपण वाढलं आहे. त्यामुळे कुटूंबाचा चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करू शकतो. आता तर माझी मुलं चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करतील, असं रुपेश गायकवाड सांगत होते.   

माथेरानमध्ये सध्या 95 रिक्षाचालक आहेत. घोड्यांच्या टापांमधून उडणाऱ्या धुळीमध्ये घोड्याची लीद मिसळून रिक्षाचालकांना दमा, टीबी असे श्वसनजन्य विकार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालकांना प्राण गमवावे लागले आहेत. मानवी हक्क आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. ई-रिक्षा झाल्यास पर्यावरणाचे रक्षण होणार असून मानवी आरोग्यासही उपयुक्त ठरणार आहे.

ई-रिक्षाचा एक यशस्वी लढा

माथेरानमधील श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संघाने येथे ई रिक्षा सुरु करण्यात याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.गावात ई-रिक्षा सुरु व्हावी यासाठी इथले स्थानिक आणि श्रमिक रिक्षा चालक संघटनेचे सचिव सुनिल शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. ते सांगतात, 'मी मूळचा माथेरानचा रहिवासी. माझं शिक्षण झाल्यावर मुंबईला शिक्षक पदावर मी नोकरीला लागलो आणि माझे मित्र माथेरानमध्येच हातरिक्षा ओढत होते. मी माथेरानला गेलो की, मित्र हसत हसत म्हणायचे तुला नोकरी लागली आणि तू मुंबईला गेला.

apsara 5.jpg 

आम्ही मात्र किती दिवस हातरिक्षा ओढायची. तू चांगलं आयुष्य जगतोय. आम्हालाही सन्मानाने, चांगलं आयुष्य जगायची संधी कधी मिळणार ? त्यांचे हे शब्द माझ्या मनाला लागले. त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार केला. 'हातरिक्षा  ओढणे' हे काम आता त्यांना नकोसं झालं होत. लोक चंद्रावर गेलेत आणि हे अजूनही हातरिक्षाच ओढत आहेत. माथेरानहे  पर्यटन स्थळ आहे. तिथले पर्यटकच त्याचा रोजगार आहे त्यामुळे हातरिक्षाला दुसरा पर्याय काय आहे याचा विचार केला. 

सुनील शिंदे पुढे सांगतात की, '2003 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानला इकोसेन्सिटिव्ह झोन (Eco-Sensitive Zone) म्हणून घोषित करण्यात आलं. हा निर्णय माथेरानच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या संरक्षणासाठी आणि तेथील जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घेण्यात आला. त्यामुळे वाहनांना बंदीच होती. मग आम्ही काही तज्ञ लोकांशी चर्चा केली. 

हातरिक्षा चालकांचं श्रम कमी करून त्यांच्या व्यवसायात बदल करता येईल का? चर्चेतून पुढे आलं की हातरिक्षाला ई रिक्षा हा पर्याय असू शकतो. मग आम्हीच पाठपुरावा केला. त्याच आज फळ मिळालं. माथेरानमध्ये 94 हातरिक्षा चालक आहेत त्यातील वीस लोकांना ई- रिक्षा मिळालेत. बाकीच्या लोकांनाही हळूहळू मिळतील. ई- रिक्षांमुळे त्यांचं श्रम कमी होईल आणि आर्थिक परिस्तिथी सुधारेल त्यामुळे त्यांची पुढची शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल.

हातरिक्षा बंद करण्याचा निर्णय म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाला ओढण्याच्या अमानुष प्रथेवर अखेरचा पडदा आहे. हा निर्णय मानवी प्रतिष्ठा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्यच मानला जातो. हातरिक्षा ओढण्यामुळे अनेक जणांचे हृदयविकाराने प्राण गेले, हा कटू वास्तव आहे. पण दुसरीकडे, हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला असल्याने अनेक कुटुंबांचं आयुष्य त्यावरच अवलंबून आहे.

शिक्षण, कौशल्य किंवा पर्यायी उत्पन्नाची साधनं नसल्यामुळे ही मंडळी दुसऱ्या कोणत्या व्यवसायात सहजपणे स्थलांतर करू शकत नाहीत. ई-रिक्षा हा एक स्वागतार्ह पर्याय असला, तरी त्याचा लाभ सर्वांना समानरित्या मिळालेला नाही. ज्यांना ई-रिक्षा मिळाल्या नाहीत, त्यांचा रोजगार धोक्यात आला असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या घरच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.

 

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...