Skip to main content

आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार

Sumitra Vasave
25 Dec 2025
3 min read
33 views
आदिवासी आश्रम शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच बलात्कार

नंदुरबारमध्ये एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी मुख्यापकाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने आपल्या आई-वडिलांना तिच्यासोबत घडलेल्या भायनक प्रकाराबद्दल सांगितलं असता या प्रकरणी धडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात असून मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्यांमुळे शाळेत देखील मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धडगाव तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रम शाळा तलाई येथे शिकणाऱ्या 14 वर्षीय 8 महिन्याच्या विद्यार्थिनीवर संशयित मुख्याध्यापक सायसिंग मोवाश्या वसावे याने पीडित विद्यार्थिनीवर जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आश्रमशाळेतील कार्यालय आणि एका गावाजवळील जागेत अत्याचार केले. त्यासाठी त्याला वॉर्डन महिला ही वेळोवेळी काही तरी काम सांगून विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये पाठवत होती. ही प्रकार बाहेर सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही सदर विद्यार्थिनीला देण्यात आली.

वारंवारच्या या प्रकाराने व मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने सदर बाब तिच्या आई-वडिलांना सांगितल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक सायसिंग वसावे व वॉर्डन महिला मालती पाडवी यांच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहे.

ही घटना समोर आल्यानंतर, विशेषत: आदिवासी संघटनांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गावकरी आणि आदिवासी संघटनांकडून आता या घटनेतील आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे.

आज कोणत्याच क्षेत्रात मुली मागे नाही… मोठ्या जिद्देने आणि कष्टाने महिला आपलं ध्येय साधताना दिसत आहे… पण दुसरी आणि सर्वात वाईट बाजू म्हणजे देशाचं नाव मोठ्या करणाऱ्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे… तर कोणत्यात क्षेत्रात महिला सुरक्षित नाही… फक्त क्षेत्रच नाही तर, शाळेत देखील मुली सुरक्षित नाही… त्यामुळे मुलींना शाळेत पाठवायचं की नाही?

शाळेत देखील मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत… 3.30 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर देखील बलात्कार होत आहे. फक्त बलात्कार नाही तर, अनेक मुलींंनी यामध्ये आपले प्राण देखील गमावले आहेत… अशात महिलांच्या सुरक्षेचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे…

Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...