Skip to main content

‘निर्भया’नंतर खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्या अक्षरशः कागदावरच राहिल्यात’ - योगिता भयाना

Yogita Bhayana
02 Jan 2026
4 min read
17 views
‘निर्भया’नंतर खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्या अक्षरशः कागदावरच राहिल्यात’ - योगिता भयाना

योगिता भयाना

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देणाऱ्या योगिता भयाना यांनी नुकतीच एका माध्यमसंस्थेला मुलाखत दिली आहे. योगिता यांनी सांगितले की, सत्याचा विजय झाला आहे, पण खरा विजय तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक महिलेला न्याय मिळेल. भयाना यांनी न्याय व्यवस्थेतील त्रुटी आणि दोषींना वाचवण्याच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला. ‘उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणाऱ्या योगिता भयाना यांनी पीडितेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की व्यवस्था पूर्णपणे दोषींना वाचवण्यात गुंतलेली असते. न्याय व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत, निर्भया प्रकरणानंतर खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्या अक्षरशः कागदावरच राहिल्यात…’


कोण आहेत योगिता भयाना?


योगिता भयाना या भारतातील एक बलात्कारविरोधी महिला कार्यकर्त्या आहेत, ज्या पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया (पीएआरआय) या संस्थेच्या प्रमुख आहेत. ही संस्था बलात्कार पीडितांचे समर्थन करते आणि त्यांच्या अत्याचारांना न्याय मिळवून देण्यात मदत करते. त्यांनी दिल्लीत २०० बेघरांना आसरा देणार्‍या अनाथगृहाची स्थापना केली आहे. लैंगिक हिंसाविरोधी प्रयत्नांची सुरुवात करणाऱ्या बलात्कार पीडितांना समर्थन मिळवून दिले आहे. त्यांनी "नारी के दो दिन" नावाचे एक अभियान सुरू केले आहे, ज्याचा उद्देश महिलांच्या मुद्द्यांवर संसदेचे विशेष सत्र आयोजित करणे आहे.-


तुम्ही उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला सातत्याने पाठबळ देत आलात, सुप्रीम कोर्टाच्या अलिकडच्या आदेशाकडे तुम्ही कसे पाहता?


योगिता भयानाः सत्याचा विजय झाला आहे. पण सत्य हेही आहे की प्रत्येक प्रकरणात इतका जनरेटा आणि माध्यमांचा पाठिंबा मिळत नाही, तरीही प्रत्येक महिला न्यायाची अधिकारी आहे. या विजयाला खरा विजय तेव्हाच मानता येईल जेव्हा देशातील प्रत्येक महिलेला न्याय मिळेल.


User Image

गेल्या काही दिवसांत आपण अशी अनेक प्रकरणे पाहिली आहेत, जिथे न्यायालयात न्यायाची लढाई लढणाऱ्या मुलींना विजय मिळाला नाही. पण होय, या विजयाने एक गोष्ट घडली आहे की इतर पीडितांमध्येही न्यायासाठीची आशा जागृत झाली आहे. कन्विक्शन रेट ( दर ) कमी आहे, गुन्हे आणि गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. न्याय प्रणालीमुळे निराश होऊन महिलांचा त्यावरील विश्वास उडत चालला आहे. मनोबल तुटते आहे. अशा यंत्रणेमध्ये जिथे न्यायप्रणाली त्यांना साथ देत नाही, या आदेशाने न्यायाची आशा सोडून दिलेल्या महिलांना नवीन बळ मिळेल की जर या सर्व्हायव्हरला न्याय मिळू शकतो तर आम्हाला का नाही मिळणार?


देशामध्ये पीडितेच्या संरक्षणाबाबत नेहमी प्रश्न उपस्थित होत राहिले आहेत, या दृष्टीने हे प्रकरण एक उदाहरण म्हणून समोर आले आहे का? पीडितेच्या बहिणीने सुरक्षिततेविषयी मागेच चिंता व्यक्त केली आहे.


योगिता भयानाः या प्रकरणात आपण स्वतः पाहिले आहे की पीडितेच्या कुटुंबीयांची हत्या कशी केली गेली. अशा प्रकरणांमध्ये पीडित स्वतः एक साक्षीदार असते आणि तिची सुरक्षा सर्वोच्च असते. या पीडितेला सुरक्षा पुरवली गेली, पण तिच्या कुटुंबाची सुरक्षा काढून घेतली गेली होती. या पीडितेला सुरक्षा मिळाली तशी, सर्वांना कुठे मिळते? अशा वेळी हे आवश्यक आहे की असे वातावरण निर्माण होईल की या सर्व गोष्टींची गरजच पडणार नाही. कारण अशा परिस्थितीचाच गैरफायदा आरोपी पक्ष घेतो. त्यांना वाटते की कोणी त्यांचे काहीच वाकडे करु शकत नाही.


आपल्या देशात साक्षीदाराचे संरक्षण नावाची कोणतीही व्यवस्था नाही. भीती वाटत असल्यामुळेच अनेक महिला आपली न्यायाची लढाई सोडून देतात किंवा ती सुरूच करत नाहीत.


बिल्किस बानो प्रकरण असो किंवा उन्नाव प्रकरण, दोषींच्या समर्थनात घोषणा आणि त्यांच्या स्वागतासारख्या घटना न्यायादानात कसे अडथळे निर्माण करतात?


योगिता भयानाः न्यायाची लढाई खूप कठीण आहे. दोषींचे फुलांच्या हारांनी आणि मिठाई खाऊ घालून स्वागत होते. न्यायिक प्रक्रियेतच खूप संघर्ष असतो, अशा वेळी जेव्हा पीडित दोषींबद्दलचे वर्तन पाहते, तेव्हा तिचे मनोबल खूप तुटते. अशा वेळी कोर्टाने सुनिश्चित करावे की असे प्रकार घडू नयेत. गुरमीत राम रहीम आणि आसाराम बाहेर आल्यानंतर त्यांच्या भक्तांकडून त्यांच्या समर्थनार्थ मिरवणूका काढल्या जातात. सुप्रीम कोर्ट या मुद्द्यावर स्वतःहून कारवाई का करू शकत नाही? अशा प्रकारांमुळे देशात,समाजात खूप चुकीचा संदेश जातो, पीडितांचे मनोबल तुटते.


समाज, कायदा आणि पोलिस... या सर्व व्यवस्थांमध्ये अशा प्रकरणांबाबत कशा प्रकारच्या संरचनात्मक कमतरता आहेत?


योगिता भयानाः न्याय व्यवस्थेत खूप कमतरता आहेत, निर्भया प्रकरणानंतर खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्या कागदावरच राहिल्या. कुणालाही याकडे लक्ष देणे योग्य वाटले नाही. सरकार आणि व्यवस्थेकडे कोणतीही ब्लूप्रिंटच नाहीये.संपूर्ण व्यवस्था महिलांना पाठिंबा देण्याऐवजी दोषींना,आरोपींना वाचवण्याच्या प्रयत्नात गुंतलेली असते. पीडितांना माहितीच होत नाही की त्यांच्याप्रकरणी काय चालले आहे ते. याबाबतचे एक लहानसे उदाहरण घ्या, या प्रकरणात पीडितेने मला सांगितले की दीदी, जर मला इंग्रजी येत असते तर मी माझी केस स्वतः लढले असते, वकीलांची गरजच पडली नसती.


User Image

हायकोर्टात जेव्हा यासंबंधीचा आदेश आला तेव्हा तिला ठाऊकच नव्हते की प्रकरणात पुढे काय झाले? तिने रडत-रडत फोन करून सांगितले की काहीतरी चुकीचे झाले आहे. कोणत्याही सुनावणीत तिला कधी समजावून सांगितले जात नव्हते की सुनावणीदरम्यान काय झाले आहे? भाषा मोठा अडथळा ठरत आहे. सार्वजनिक अभियोक्ता (सरकारी वकील) आणि पीडितेमधील संवादात मोठी दरी आहे. पीडितेसोबत कसे वर्तन करावे, याबाबतचे तपास अधिकाऱ्यांचे ट्रेनिंगही नीट नाही. वकीलांसह पूर्ण न्यायिक व्यवस्थेत पीडितेबाबत संवेदनशीलता दाखवली जात नाही. प्रक्रियात्मक कमतरता खूप अधिक आहेत. कायद्याला सोडून बाकी सर्व गोष्टी वाईट आहेत.


ऑनलाइन स्पेसमध्ये एक नॅरेटिव्ह हेही होते की या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा आरोपांवर तुम्ही काय सांगाल?


योगिता भयानाः अराजकीय असे काहीही नसते.आपण सर्वजण मतदान करतो.एक सरकार निवडतो. जर राजकारणी यात हस्तक्षेप करत नाहीत तर ते चुकीचे आहे. तरीही याचा राजकीय फायदा घेऊ नये. राजकारणात मुद्द्यांचे राजकारण असायलाच हवे. जर विरोधी पक्ष आणि राजकारण आपले काम करतील तर आमच्या अॅक्टिव्हिझमची गरजच पडणार नाही. आम्ही फक्त अंतर भरुन काढण्याचे आहोत. या संकल्पनेतून बाहेर यायला हवे की राजकारण असता कामा नये, मुद्द्यांवर आधारीत राजकारण का नसावे?


(मूळ हिंदी मुलाखत नवभारत टाइम्स वरुन साभार, मराठी अनुवादः भरत यादव)


Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...