Skip to main content

तमिळनाडूतील शाळेत जातीय अन्याय; दलित स्वयंपाकी महिलेला नोकरीवरून काढल्याचा आरोप...

Team BaiManus
25 Dec 2025
3 min read
4 views
 तमिळनाडूतील शाळेत जातीय अन्याय; दलित स्वयंपाकी महिलेला नोकरीवरून काढल्याचा आरोप...

तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात जातीय भेदभावाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. थोगमलाई तालुक्यातील पंचायत युनियन मिडल स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या 35 वर्षीय दलित महिलेला जातीच्या आधारावर अपमान सहन करावा लागला असून, याच कारणामुळे तिला ‘मुख्यमंत्री नाश्ता योजना’ अंतर्गत स्वयंपाकी पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. पीडित महिलेने या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून न्यायाची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री नाश्ता योजनेअंतर्गत नियुक्ती

थोगमलाई युनियनमधील चिन्ना रेड्डीपट्टी गावात राहणाऱ्या आर. निरोशा यांची 10 सप्टेंबर 2025 रोजी पंचायत युनियन माध्यमिक शाळेमध्ये स्वयंपाकी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तमिळनाडू सरकारच्या मुख्यमंत्री नाश्ता योजनेअंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस नाश्ता देण्याचा उद्देश आहे. या योजनेत संबंधित शाळेत दोन महिलांची स्वयंपाकी म्हणून नेमणूक करण्यात आली होती, त्यापैकी निरोशा एक होत्या.



निरोशा नियमितपणे शाळेत येऊन विद्यार्थ्यांसाठी नाश्ता तयार करत होत्या आणि सुरुवातीला कोणतीही तक्रार नसल्याचे त्या सांगतात. मात्र काही दिवसांनंतर परिस्थिती बदलू लागली.

पालकांकडून आक्षेप आणि अपमानजनक टिप्पण्या

निरोशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या हातून नाश्ता बनवण्यास तीव्र आक्षेप घेतला. या पालकांनी निरोशा यांच्या जातीचा उल्लेख करत अपमानास्पद आणि हीन वागणूक देणाऱ्या टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या टिप्पण्यांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे निरोशा यांनी सांगितले. जातीय द्वेषातूनच पालकांनी आपल्या मुलांना नाश्ता योजनेत सहभागी होण्यापासून रोखले, असा दावा त्यांनी केला आहे. निरोशा यांचा आरोप आहे की 16 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका भानुमती यांनी त्यांना बोलावून घेतले आणि पालकांनी आपल्या मुलांना नाश्त्यासाठी पाठवणे बंद केल्याचे कारण देत काम थांबवण्यास सांगितले.

त्यांच्या जागी दुसऱ्या महिलेची नेमणूक

पीडितेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या, तेव्हा त्यांच्या जागी दुसरी महिला स्वयंपाक करत असल्याचे दिसून आले. निरोशा यांचा दावा आहे की ही महिला सवर्ण हिंदू समाजातील आहे. यामुळे आपल्यावर झालेला भेदभाव अधिक स्पष्ट झाल्याचे निरोशा यांनी सांगितले. या घटनेनंतर निरोशा यांनी ‘महालिर थिट्टम’ योजनेच्या ब्लॉक मिशन मॅनेजर (BMM) यांच्याशी संपर्क साधला. मात्र, तेथेही मुख्याध्यापिकांनी दिलेलेच उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर 18 डिसेंबर रोजी निरोशा यांनी थोगमलाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी असा आरोप केला की मुख्याध्यापिकांच्या दबावामुळेच बीएमएम यांनी त्यांना ड्युटीवर येण्यास मनाई केली आहे.



आपल्या जातीबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या आणि भेदभाव करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण कामावर परत जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ रोजगाराचा प्रश्न नसून सन्मान आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे निरोशा यांनी अधोरेखित केले आहे.

सामाजिक प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे तमिळनाडूसारख्या प्रगत राज्यातही जातीय भेदभाव अजूनही अस्तित्वात असल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या दलित महिलेला असा अनुभव येणे ही गंभीर बाब असून, या प्रकरणाकडे सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने पाहिले जावे असं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...