Skip to main content

परंपरेला फाट्यावर मारत पार पडला अनोखा विवाह, रिटर्न गिफ्ट ऐवजी उतरवला गावातील नागरिकांचा अपघात विमा…

Article in Marathi
Team BaiManus
27 May 2026
24 views
परंपरेला फाट्यावर मारत पार पडला अनोखा विवाह, रिटर्न गिफ्ट ऐवजी उतरवला गावातील नागरिकांचा अपघात विमा…

टीम बाईमाणूस 


  • भारतीय विवाह सोहळे हे पारंपारिकरित्या सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ओळखले जातात. या सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च भव्य सजावट, आतिषबाजी आणि पाहुणचारावर केला जातो. 


  • मात्र, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात एक असा विवाह सोहळा पार पडला, ज्याने विवाह सोहळ्याच्या खर्चाला सामाजिक उत्तरदायित्वाच्या चौकटीत बसवून संपूर्ण समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.


  • सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या २० मे रोजी पार पडलेल्या विवाहात पेठकर कुटुंबाने पारंपरिक रिटर्न गिफ्ट ऐवजी गावातील नागरिकांचा अपघात विमा उतरवून संपूर्ण गावाला आर्थिक सुरक्षेचे एक अभूतपूर्व कवच प्रदान केले आहे.


भारतीय विवाह सोहळे हे पारंपारिकरित्या सामाजिक आणि आर्थिक प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्यासाठी ओळखले जातात. या सोहळ्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च भव्य सजावट, आतिषबाजी आणि पाहुणचारावर केला जातो. मात्र, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात एक असा विवाह सोहळा पार पडला, ज्याने विवाह सोहळ्याच्या खर्चाला सामाजिक उत्तरदायित्वाच्या चौकटीत बसवून संपूर्ण समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला.


सिद्धेश्वर पेठकर आणि मंजुषा यांच्या २० मे रोजी पार पडलेल्या विवाहात पेठकर कुटुंबाने पारंपरिक रिटर्न गिफ्ट ऐवजी गावातील नागरिकांचा अपघात विमा उतरवून संपूर्ण गावाला आर्थिक सुरक्षेचे एक अभूतपूर्व कवच प्रदान केले आहे.


३३.६ कोटींचे सामूहिक विमा संरक्षण…


बहादरपुरा गावातील तब्बल ३,४६५ नागरिकांचा प्रत्येकी १ लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला. या संपूर्ण विम्याची एकत्रित जोखीम रक्कम तब्बल ३३.६ कोटी रुपयांच्या घरात आहे. विवाह सोहळ्याला ४,५०० हून अधिक वऱ्हाडी आणि पाहुणे उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या बाह्य देखाव्यापेक्षा नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबाने गावकऱ्यांना जी परतीची भेट दिली, ती खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. हे अपघात विमा कवच आगामी एका वर्षासाठी वैध असणार असून, पुढील काळात या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


User Image


ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पारदर्शक अंमलबजावणी


कोणत्याही विमा योजनेच्या यशातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे किचकट कागदपत्रे. मात्र, पेठकर कुटुंबाने यावर कार्यक्षम प्रशासकीय उपाय शोधला. त्यांनी वैयक्तिक विमा पॉलिसी खरेदी करण्याऐवजी स्थानिक ग्रामपंचायतीच्या नावाने सामूहिक विमा पॉलिसी खरेदी केली.


गावातील कोणताही पात्र नागरिक या सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने थेट गावाच्या अधिकृत मतदार यादीचा वापर केला. यामुळे कोणतीही किचकट कागदपत्रे भरणे किंवा वैयक्तिक वैद्यकीय चाचण्यांशिवाय संपूर्ण गावाला एकाच वेळी विनासायास विम्याचे संरक्षण प्राप्त झाले.


निर्णयामागील सामाजिक भान


हा निर्णय केवळ भावनेच्या भरात घेतलेला नसून, त्यामागे मराठवाड्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असुरक्षिततेची स्पष्ट जाण आहे. मराठवाडा हा कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेला प्रदेश असून, येथे शेतात काम करताना सर्पदंश होणे, वीज पडणे किंवा जंगली प्राण्यांचे हल्ले होणे यांसारख्या घटना वारंवार घडतात.


याविषयी बोलताना नवरदेव सिद्धेश्वर पेठकर म्हणाले, 


"आमच्या गावात शेती आणि मजुरी करणारी लोकसंख्या खूप आहे. शेती करताना होणारे अपघात आम्ही नेहमी पाहतो. यातूनच गावकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मदत करण्याची संकल्पना समोर आली." भारतीय संस्कृतीतील दानाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, "आमच्या संस्कृतीत दानाचा गाजावाजा केला जात नाही. आम्हाला कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, केवळ गावकऱ्यांचे आशीर्वाद पुरेसे आहेत."


यावेळी नवरीने देखील प्रतिक्रिया दिली. "आमच्या लग्नाची छोटीशी भेट म्हणून आम्ही सर्व गावाचा विमा काढत आहोत. मला याबाबत खूप चांगलं वाटत आहे की, आमच्या लग्नाबद्दल इतकी बहुमुल्य भेट दिली जात आहे", अशी प्रतिक्रिया नवरीने दिली.


सिद्धेश्वर यांचे मोठे भाऊ अनुप पेठकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले, 


"लग्नाचा आनंद केवळ आमच्यापुरता मर्यादित न राहता तो गावकऱ्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणणारा ठरावा," अशी भावना अनुप पेठकर यांनी व्यक्त केली. या कल्पनेविषयी बोलताना ते म्हणाले, "ग्रामीण भागात साप चावणे, अंगावर वीज पडणे किंवा इतर अनपेक्षित अपघातांमुळे मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशा वेळी गरीब कुटुंबांवर आभाळ कोसळते. माझ्या लहान भावाचे लग्न हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. हाच आनंद द्विगुणित करताना गावकऱ्यांसाठी काहीतरी ठोस आणि उपयुक्त करावे, या विचारातून आम्ही हा निर्णय घेतला."


एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांचा विमा उतरवण्यासाठी नेमका किती खर्च आला, हे सांगण्यास मात्र या कुटुंबाने नम्रपणे नकार दिला. नवरदेव सिद्धेश्वर पेठकर म्हणाले, 


"आपल्या संस्कृतीत दानाचा गाजावाजा केला जात नाही. आम्हाला कोणत्याही प्रसिद्धीची किंवा कौतुकाची हाव नाही. आमच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे गावकऱ्यांचे भले व्हावे आणि त्यांचे आशीर्वाद -आमच्या पाठीशी राहावेत, हीच आमची इच्छा आहे."


User Image


समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातून उमटलेल्या प्रतिक्रिया


या घटनेची माहिती सार्वजनिक होताच विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या.बहादरपुरा गावचे सरपंच बळीराम पेठकर यांनी याला ऐतिहासिक घटना म्हटले. तर, गावातील नागरिक मोहन शेकापुरे यांनी या कृतीची तुलना संपूर्ण गावाला शगून म्हणून पांघरलेल्या संरक्षणात्मक शालीशी केली.


शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत, 'अतिरेकी खर्चापेक्षा संवेदनशीलतेला प्राधान्य देणाऱ्या या विचारशील तरुणांना अधिक बळ मिळायला हवे,' असे मत व्यक्त केले.


समाजमाध्यमांवर या उपक्रमाचे मोठे कौतुक झाले, मात्र त्याचवेळी काही नागरिकांनी व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जे काम सरकारने करायला हवे होते, ते एका सामान्य नागरिकाने केले आहे. सरकारची आश्वासने पूर्ण करण्यासाठी आता विवाह सोहळ्यांची गरज भासू लागली आहे," अशी टीकात्मक टिप्पणीही काही युजर्सनी केली.


पाश्चात्य वेडिंग इन्शुरन्स काढणे सामान्य पण..


पाश्चात्य देशांमध्ये 'वेडिंग इन्शुरन्स' काढणे सामान्य आहे, परंतु त्याचा उद्देश सोहळ्यातील स्वतःच्या आर्थिक गुंतवणुकीचे रक्षण करणे हा असतो. तो पूर्णपणे स्व-केंद्रीत जोखीम व्यवस्थापन प्रकार आहे. याउलट, नांदेडमधील बहादरपुरा मॉडेल हे भारतीय संस्कृतीतील सामूहिक अस्तित्वावर आधारित असून ते समाजातील लोकांच्या जीवनाचे रक्षण करणारे समाज-केंद्रीत जोखीम व्यवस्थापन आहे.


पेठकर कुटुंबाचा हा निर्णय केवळ एका विवाह सोहळ्यापुरता मर्यादित राहणारा नाही. यातून ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता आणि विम्याविषयी मोठी जागृती निर्माण झाली आहे. बहुतांश गावकऱ्यांसाठी विमा हा क्लिष्ट विषय होता, पण आता तो त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग बनला आहे. विवाह सोहळ्यातील लाखो रुपयांचा अनुत्पादक खर्च टाळून, खाजगी भांडवलाचा वापर ग्रामीण सुरक्षेसाठी कसा करता येऊ शकतो, याचा एक अत्यंत व्यावहारिक आणि अनुकरणीय वस्तुपाठ नांदेडच्या या कुटुंबाने घालून दिला आहे.




Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...