Skip to main content

मंचावरच हिजाब खेचला! नितीश कुमारांच्या कृतीमुळे, डॉ. नुसरत बिहार सोडून कोलकात्याकडे रवाना…

Article in Marathi
Team BaiManus
17 Dec 2025
16 views
मंचावरच हिजाब खेचला! नितीश कुमारांच्या कृतीमुळे, डॉ. नुसरत बिहार सोडून कोलकात्याकडे रवाना…

बिहारच्या राजकारणात आणि देशभरात मोठा वाद निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनियुक्त डॉक्टरांच्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिला डॉक्टरचा सार्वजनिकपणे हिजाब हटवल्याचा आरोप होत आहे. या घटनेत संबंधित महिला डॉक्टर नुसरत परवीन यांना तीव्र मानसिक धक्का बसला असून त्यांनी बिहार सोडून थेट कोलकाता गाठल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ज्या सरकारी नोकरीसाठी त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली होती, ती नोकरी स्वीकारण्यासही त्यांनी नकार दिला आहे.

नियुक्तीपत्र कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

15 डिसेंबर रोजी पाटणा येथे राज्य सरकारतर्फे नवनियुक्त आयुष डॉक्टरांसाठी नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः उपस्थित होते. या वेळी नुसरत परवीन या डॉक्टर नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर आल्या. त्या हिजाब परिधान करून आल्या होत्या. आरोपानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त करत ‘हे काय आहे?’ असा सवाल केला आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हिजाब स्वतःच्या हाताने हटवला. ही घटना मंचावर उपस्थित अनेक लोकांसमोर घडली. काही लोक हसत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनेनंतर काही वेळातच अधिकाऱ्यांनी नुसरत परवीन यांना बाजूला नेले.



सोशल मीडियावर संताप, राजकीय टीका.. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस, AIMIM यांसह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कृतीवर तीव्र टीका केली आहे. ही कृती महिलांचा अपमान करणारी असून धार्मिक स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर #HijabControversy, #NitishKumar, #JusticeForNusrat असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी केली आहे.

या घटनेननंतर महिलेने बिहार सोडले... 

घटनेनंतर डॉक्टर नुसरत परवीन यांनी बिहार सोडण्याचा निर्णय घेतला असून त्या कोलकाता येथील आपल्या घरी परतल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. “मी शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमीच बुरखा घालून शिक्षण घेतलं आहे. माझ्यासाठी बुरखा हा केवळ कपडा नाही, तर माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्या कार्यक्रमात इतक्या लोकांसमोर माझा अपमान झाला. काही लोक हसत होते, ते मला खूप वेदनादायक वाटलं,” असे त्या म्हणाल्या. “मी खूप मेहनतीने इथपर्यंत पोहोचले होते. आई-वडिलांना मदत करण्याचं स्वप्न होतं. पण आता बिहारला परत जाण्याची हिंमत माझ्यात उरलेली नाही,” असे सांगत त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा.. 

या प्रकरणाची दखल भारताबाहेरही घेतली जात आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘डॉन’ने या घटनेवर सविस्तर वृत्त दिले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, नुसरत परवीन काही बोलण्याआधीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिचा हिजाब हटवला, असे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पाकिस्तान मानवाधिकार परिषदेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी ही कृती मानवी प्रतिष्ठा, धार्मिक स्वातंत्र्य आणि महिलांच्या वैयक्तिक स्वायत्ततेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारकडे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.



मानवाधिकारांचा मुद्दा ऐरणीवर..

मानवाधिकार संघटनांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत पीडित महिला डॉक्टरची अधिकृत माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस कायदेशीर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, बिहार सरकार किंवा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून या घटनेबाबत अद्याप ठोस स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र या प्रकरणामुळे नितीश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला सुरक्षा, धार्मिक स्वातंत्र्य आणि सार्वजनिक वर्तन या मुद्द्यांवरून हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

 

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...