Skip to main content

कॉलेजमधून थेट महापालिकेत...२२ वर्षांची सई थोपटे पुण्याची सर्वात तरुण नगरसेविका…

Article in Marathi
Apsara Aga
17 Jan 2026
3 min read
35 views
 कॉलेजमधून थेट महापालिकेत...२२ वर्षांची सई थोपटे पुण्याची सर्वात तरुण नगरसेविका…

अप्सरा आगा 


  • २२ वर्षीय सई थोपटे महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका.
  • शिक्षण सुरू असतानाच पुण्यात मिळवला दणदणीत विजय.
  • तरुण चेहरा म्हणून भाजपने दिली होती संधी




    पुणे शहरात नुकतीच महापालिकेची निवडणूक झाली या निवडणुकीत बावीस वर्षाच्या एका मुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचं नाव सई प्रशांत थोपटे.भाजप पक्षाने तिला तिकीट दिलं आणि तिने प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता ती महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेविका झाली आहे. हा विजय फक्त सईचा नाही, तर सर्व तरुण मुला-मुलींसाठी एक मोठी प्रेरणा आहे.


सई पुण्यातल्या एका साधारण कुटुंबातील आहे. ती सध्या पुण्यातील प्रसिद्ध सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बीबीएच्या (Bachelor of Computer Applications) शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजमध्ये लेक्चर, अभ्यास, असाइनमेंट असतानाच ती राजकारणात उतरली. बहुतेक विद्यार्थी या वयात नोकरी किंवा पुढच्या अभ्यासाची तयारी करतात, पण सईने थेट निवडणूक लढवली आणि जिंकलीही!


अनुभवी उमेदवारांना मागे टाकत मिळवला विजय


सईला भारतीय जनता पक्षाने संधी दिली. प्रभाग ३६ (क) मध्ये सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी सारखे भाग येतात. हा भाग मध्यमवर्गीय लोकांचा आहे. इथे रस्ते, पाणी, कचरा, शाळा अशा रोजच्या समस्या आहेत. भाजपला इथे तरुण चेहरा हवा होता. सईने अगोदर पक्षात काम केलं होतं, म्हणून त्यांना तिकीट मिळालं. प्रचारात त्या स्वतः फिरल्या, लोकांना भेटल्या, त्यांच्या समस्या ऐकल्या. अनुभवी उमेदवारांना मागे टाकत त्यांनी विजय मिळवला. लोकांना तरुण नेतृत्व आवडलं.


User Image

सईने प्रचारात सोपे आणि गरजेचे मुद्दे घेतले. त्यांनी सांगितलं की, प्रभागात चांगले रस्ते हवे आहेत, कारण खड्ड्यांमुळे लोकांना त्रास होतो. पाण्याची समस्या सोडवायची आहे. रोज पाणी यावं, टंचाई पडू नये. कचरा नीट उचलला जावा, स्वच्छता राहावी. शाळा आणि कॉलेजसाठी चांगल्या सुविधा हव्या आहेत, जेणेकरून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल.


सई म्हणते, आता खरं काम सुरु होईल 


महिला आणि मुलींसाठी विशेष योजना हव्या आहेत. उदाहरणार्थ, मुलींसाठी सुरक्षित वातावरण, खेळाची मैदानं, आणि स्वयंरोजगाराच्या संधी. तरुणांसाठी रोजगाराच्या योजना हव्या आहेत. सई म्हणते, "मी स्वतः तरुण आहे, म्हणून तरुणांच्या समस्या चांगल्या समजतात."प्रचारात ती कॉलेजच्या मित्रांसोबत फिरली, सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या, आणि लोकांना विश्वास दिला की ती खरंच काम करणार.'विजयी झाल्यानंतर सईने सर्वांना धन्यवाद दिले. तिने सांगितलं की, आता खरं काम सुरू होईल. प्रभागातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी ती प्रयत्न करणार. ती कॉलेजचा अभ्यासही पूर्ण करेल आणि नगरसेविकेची जबाबदारीही नीट सांभाळेल. तिचा विश्वास आहे की, तरुण पिढी राजकारणात आली तर शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत होईल.


हा विजय म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात….


सईचा हा प्रवास का खास आहे? कारण याआधी फार कमी तरुण मुली राजकारणात आल्यात. बहुतेक वेळा मोठ्या नेत्यांचेच चेहरे दिसतात. पण सईने दाखवून दिलं की, वय कमी असलं तरी मेहनत आणि चांगले विचार असतील तर यश मिळतं. पुण्यासारख्या मोठ्या शहरात अशा तरुण नेत्यांची गरज आहे. ते नव्या कल्पना आणतील, डिजिटल युग समजतील आणि लोकांच्या जवळ राहतील.शेवटी, सई थोपटे हिचा विजय हा एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तरुण मुला-मुलींनी राजकारणाकडे गांभीर्याने पाहावं. राजकारण हे फक्त पैसा किंवा पॉवर नाही, तर लोकांची सेवा आहे. सईंनी हे दाखवून दिलं.


पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सईचा झालेला हा विजय शहराच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा आहे. दीर्घकाळ प्रस्थापित नेतृत्वाच्या प्रभावाखाली राहिलेल्या महापालिकेच्या राजकारणात यावेळी तरुण उमेदवार, महिला प्रतिनिधित्व आणि नव्या विचारसरणीचा ठसा स्पष्टपणे उमटलेला दिसून आला. प्रचार, मतदान आणि निकाल या संपूर्ण प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढलेला दिसत असून, शहराच्या विकासाबाबत मतदार अधिक जागरूक झाल्याचं चित्र या निवडणुकीतून समोर आलं. 


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...