Skip to main content

कर्जाच्या ओझ्याखाली विदर्भ…5,500कोटींच्या कर्जमाफीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

Article in Marathi
Apsara Aga
21 Feb 2026
4 min read
4 views
कर्जाच्या ओझ्याखाली विदर्भ…5,500कोटींच्या कर्जमाफीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

अप्सरा आगा



  •  विदर्भातील ५.५५ लाख शेतकऱ्यांवर सुमारे ५,५०० कोटींचं थकीत कर्ज
  •  कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  •  मानसिक दिलासा आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठी ठोस निर्णयाची अपेक्षा



'आता तरी सरकारनं आमचं ऐकावं' शेताच्या बांधावर, गावाकडच्या चावडीवर, बाजारपेठेत सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफीची. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यात महाराष्ट्रासह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काही मोठा निर्णय होणार का? गावाकडच्या बोलीत सांगायचं तर, 'आता तरी सरकारनं आमचं ऐकावं' अशी भावना शेतकरी बांधवांच्या मनात उसळली आहे. कारण मुद्दा आहे थेट कर्जमाफीचा. तब्बल ५,५०० कोटी रुपयांच्या थकबाकीचा. त्यामुळं कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनात होईल का? याकडे शेतकऱ्यांचं  लक्ष लागून आहे.


दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतीचं गणित कोलमडलं आहे. महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना विदर्भातून मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, साडेपाच लाखांहून अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यांच्या डोक्यावर जवळपास ५,४०० ते ५,५०० कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे. गेल्या काही वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट या सगळ्या संकटांनी शेतीचं गणित पूर्ण बिघडवलं. पेरणी झाली, तर पाऊस नाही, पाऊस आला तर पिकं वाहून जातात. शेवटी बँकेचं कर्ज वाढतच गेलं.


पीक काढायचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं?


“पीक काढायचं कसं आणि कर्ज फेडायचं कसं?” असं अनेक  शेतकरी बोलू लागले आहेत. विदर्भातील ५ लाख ५५ हजार ८०७ शेतकऱ्यांकडे ५४१० कोटी ७८ लाख २१ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. बँकेच्या नोटिसा, पतसंस्थेची वसुली, व्याजावर व्याज यातून मार्ग काढणं कठीण झालं आहे. अनेकांनी सोनं तारण ठेवलं, काहींनी जमीन गहाण टाकली, तर काहींच्या घरात रोजच्या खर्चासाठीही पैसे उरले नाहीत. अशा परिस्थितीत कर्जमाफी हा शब्दच त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरतो.


User Image

यवतमाळमधला एक शेतकरी म्हणतो, ''दरवर्षी नवं कर्ज काढतो, जुनं फेडायला. शेवटी दोन्ही वाढतंच राहतं.'' कुणी सोनं तारण ठेवलं, कुणी जमीन गहाण टाकली, तर कुणाच्या घरात रोजच्या खर्चासाठीही पैसे उरले नाहीत. त्यामुळं कर्जमाफी हा शब्दच मानसिक दिलासा देणारा ठरतो. 


याआधीही महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफीच्या घोषणा केल्या होत्या. काही योजना राबवल्या गेल्या, पण सर्वच पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला का, हा प्रश्न कायम आहे. अनेकांना कागदपत्रांच्या त्रुटी, आधार-लिंकिंग, केवायसी अपडेट नसल्यामुळं लाभापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळं यावेळी जर कर्जमाफी जाहीर झाली, तर ती खऱ्या अर्थानं सर्व गरजूंपर्यंत पोहोचावी, अशी मागणी होत आहे.


विदर्भ आत्महत्याग्रस्त पट्टा 


विदर्भ हा राज्यातील आत्महत्याग्रस्त पट्टा म्हणून ओळखला जातो. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवर अवलंबून असलेला शेतकरी हवामानाच्या लहरीपणामुळे आणि बाजारभावातील चढउतारामुळे आर्थिकदृष्ट्या अस्थिर झाला आहे. उत्पादन खर्च वाढला, बियाणं, खतं, औषधं, मजुरी सगळंच महागलं. पण माल विकायला गेलं की भाव मात्र तोकडाच. त्यामुळं उत्पन्न आणि खर्च यांचं गणित जुळेनासं झालं आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून शेती आणि ग्रामीण भागासाठी मोठ्या तरतुदी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ५,५०० कोटींच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाला, तर लाखो कुटुंबांना दिलासा मिळू शकतो. मात्र, सरकारसमोर आर्थिक शिस्तीचं आव्हानही आहे. एवढी मोठी रक्कम उभी करणं, त्यासाठी निधीचं पुनर्विनियोजन करणं, विकासकामांवर परिणाम होऊ न देणं ही सगळी तारेवरची कसरत आहे.


अंमलबजावणीवर भर देण्याची मागणी


राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापलेला आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. घोषणांवर नाही, तर अंमलबजावणीवर भर द्या, असं ते सांगत आहेत. तर सत्ताधारी म्हणतायत, योग्य पात्र शेतकऱ्यांनाच लाभ देण्यासाठी पारदर्शक प्रक्रिया राबवू. पण शेतकऱ्याला या सगळ्या राजकारणापेक्षा हवंय ते फक्त एक कर्जातून सुटका.


User Image

गावागावातील शेतकऱ्याची अपेक्षा आहे की, “कर्ज माफ झालं तर परत उभा राहू. पुन्हा शेती करायला हिंमत येईल.” कारण कर्जमाफी म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही. ती आहे मानसिक दिलासा. बँकेच्या नोटिसा थांबल्या, तर घरातला ताण कमी होईल. मुलांच्या शिक्षणाचा विचार करता येईल. पुढच्या हंगामासाठी बी-बियाणं घ्यायला हातात पैसे उरतील.


तज्ज्ञ काय सांगतात?


तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून हमीभावाची हमी, पिकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सिंचन सुविधा, प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अन्यथा काही वर्षांनी पुन्हा तोच प्रश्न उभा राहील.

 

जिल्हानिहाय थकबाकीचा आढावा :

  1. गडचिरोली जिल्हा

- थकीत शेतकरी- 4 हजार 247

- थकीत रक्कम - 36 कोटी 89 लाख 21 हजार


  1.  गोंदिया जिल्हा 

- थकीत शेतकरी - 46 हजार 603

- थकीत रक्कम - 289 कोटी 16 लाख


 3) वर्धा जिल्हा 

- थकीत शेतकरी- 19 हजार 600

- थकीत रक्कम - 120 कोटी 10 लाख


4) भंडारा जिल्हा 

- थकीत शेतकरी- 37 हजार 437

- थकीत रक्कम - 303 कोटी 80 लाख


5) यवतमाळ जिल्हा  

- थकीत कर्जदार शेतकरी - 1 लाख 32 हजार 119

- थकीत रक्कम  - 1401 कोटी 13 लाख


 6) नागपूर जिल्हा 

- थकीत कर्जदार शेतकरी - 13 हजार 234 

- थकीत रक्कम - 184 कोटी 71 लाख


7) अकोला जिल्हा 

- थकीत शेतकरी - 61 हजार 244

- थकीत रक्कम- 641 कोटी 72 लाख


8) वाशिम जिल्हा 

- थकीत शेतकरी - 60 हजार 507

- थकीत रक्कम - 621 कोटी 15 लाख


9)  बुलढाणा जिल्हा 

- थकीत शेतकरी - 28 हजार 173

- थकीत रक्कम - 228 कोटी 79 लाख


10) चंद्रपूर जिल्हा 

- थकीत शेतकरी - 79 हजार 230

- थकीत रक्कम - 785 कोटी


11)  अमरावती जिल्हा 

- जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी - 73 हजार

- अन्य बँकेचे थकबाकीदार शेतकरी - 80 हजार

- 30 जून 2025 पर्यंत थकीत कर्ज - 1500 कोटी


राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी?


महाराष्ट्र विधानमंडळाचे २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे.  या वेळी शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, तसेच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात अपेक्षित आहेत. 


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...