Skip to main content

बीडच्या केज तहसील कार्यालयात सात जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न ! प्रशासना विरुद्ध केला रोष व्यक्त

Article in Marathi
Sukeshani Naikwade
13 Jan 2026
5 min read
11 views
बीडच्या केज तहसील कार्यालयात सात जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
प्रशासना विरुद्ध केला रोष व्यक्त

सुकेशनी नाईकवाडे

- जमिनीच्या सीमांकनासाठी दिलेलं आश्वासन न पाळल्याने संतप्त झालेल्या लांडगे कुटुंबातील सात जणांनी केज तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

- न्यायालयीन आदेश असूनही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

- पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली असून, घटनेमुळे महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.



प्रशासनाकडून वारंवार दिली जाणारी आश्वासनं आणि प्रत्यक्षात होत असलेली दुर्लक्षाची वागणूक यामुळे सामान्य नागरिक किती टोकाची भूमिका घेऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण केज तहसील कार्यालयात पाहायला मिळालं. जमिनीच्या सीमांकनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या एका कुटुंबाने थेट तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.


दि. 12 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास केज तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर विष्णू लांडगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सात जणांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. पोलीस व प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.



काय आहे नेमकं प्रकरण


केज येथील रहिवासी विष्णू श्रीमंत लांडगे यांच्यासह त्यांच्या पाच भावांना सर्व्हे नंबर ३०/१ आणि ३०/२ मधील जमीन मा. दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर), केज येथील दिवाणी दावा क्रमांक ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनाम्यानुसार वाटून मिळाली आहे. न्यायालयीन आदेशानुसार प्रत्येकी ३२.४४ आर जमीन त्यांच्या नावावर देण्यात आली असून त्याची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात आली आहे.



User Image

मात्र, न्यायालयीन आदेशानंतरही प्रत्यक्ष जमिनीचे सीमांकन आणि मोजणी न झाल्याने लांडगे कुटुंबीयांना त्यांच्या हक्काच्या जमिनीचा ताबा मिळू शकलेला नाही. या जमिनीवर काही अतिक्रमणकर्त्यांनी कब्जा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.


तहसील कार्यालयाचा आदेश, पण प्रत्यक्षात कारवाई शून्य


न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून वाटप तक्ता तयार करण्यासाठी केज तहसील कार्यालयाने दि. १३ मार्च २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालय, केज यांना आदेश दिले होते. त्यानंतर दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष मोजणीसाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती.


मोजणीदरम्यान अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मोजणीच्या दिवशी अतिक्रमणकर्त्यांनी थेट मोजणीस मज्जाव केल्याने संपूर्ण प्रक्रिया अर्धवट राहिली. यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप लांडगे कुटुंबीयांनी केला आहे.


चार दिवसांचं उपोषण, तरीही निर्णय नाही


या अन्यायाविरोधात लांडगे कुटुंबातील महिला व लहान मुलांनी दि. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत केज तहसील कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केलं. उपोषणादरम्यान तहसीलदारांनी कुटुंबीयांना दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जमिनीचे सीमांकन करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं.


तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतलं. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.


दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न दिसल्याने लांडगे कुटुंबीय तहसील कार्यालयात उपस्थित राहिले. दीड तास उलटूनही कोणताही अधिकारी प्रत्यक्षात हजर न झाल्याने अखेर सायंकाळी ४ वाजता सात जणांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.या घटनेनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ कार्यालयात प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.


पोलिसांची धावाधाव, अनर्थ टळला


या घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, कॉन्स्टेबल शिवाजी कागदे तसेच महिला पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


User Image

आंदोलकांना आत्मदहनापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असतानाही पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे तहसील कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती.

न्यायालयीन आदेश असूनही प्रत्यक्ष जमिनीचा ताबा न मिळणं, दिलेली आश्वासनं वेळेत पूर्ण न करणं आणि नागरिकांना आंदोलनाच्या टोकाच्या मार्गावर ढकलणं, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


दरम्यान, संबंधित प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा लांडगे कुटुंबीयांनी दिला आहे.



Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...