Skip to main content

20 वर्षाच्या आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री, पालघरकडे सरकार लक्ष कधी देणार?

Article in Marathi
Punam Choure
08 Jan 2026
58 views
20 वर्षाच्या आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री, पालघरकडे सरकार लक्ष कधी देणार?

पुनम चौरे


  • 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री

  • लग्नाच्या नावाखाली नाशिक येथे जबरदस्तीचं लग्न

  • गर्भावस्थेत शारीरिक-मानसिक छळ


पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देऊन तीन लाख रुपयांमध्ये तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेची विक्री आणि छळ केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिला कातकरी समुदायातील आहे.


2024 मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. प्राथमिक तपासानुसार समोर आलेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरुपात तीन लाख रुपये दिले होते


गर्भावस्थेत मारहाण आणि जेवणही दिलं नाही


2024 मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महिला गरोदर असतांना पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतांना पतीने मारहाण केली होती. इतकंच नाही तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.

संबंधित लेख वाचा:


बालविवाह : कायदे, आकडे आणि सामाजिक वास्तव यातील दरी…



बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न


यांनतर बाळाच्या जन्मानंतर महिला जून 2025 रोजी आपल्या आईच्या घरी परतली. 6 जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी, त्याची आई आणि दोन मध्यस्थांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.


पुरोगामी महाराष्ट्रात कोवळ्या मुलींच्या विक्रीचा बाजार


पालघरच्या आदिवासी भागात एजंटच्या माध्यमातून अनेक मुलींचा बळी घेतला जातो. एजंट लाखो रुपये घेऊन आदिवासी समाजातील मुलींचं लग्न लावून देतात, मात्र त्या मुलींच्या भविष्यात काय होतं, त्या कशा राहतात याकडे कोणताही गंभीर दृष्टिकोन नाही. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागातील दुर्दैवी परिस्थितीमुळे इथली कुटुंबं आपल्या मुलींचं लग्न फक्त 40 ते 50 हजार रुपयांसाठी लावून देतात. त्यांना आपली मुलगी कुणाशी लग्न करत आहे, तो कुठे राहतो, याची अगदी साधी कल्पनाही नसते.


आदिवासीबहुल या भागातल्या वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडीत अशी अनेक प्रकरणं आहेत. ज्यात अल्पवयीन मुलींची लग्न करून त्यांचा सौदा केला जातोय.देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटरच्या परिसरात पालघर आणि ठाण्याचा आदिवासी भाग आहे. या आदिवासी भागाला अनेक समस्यांनी ग्रासलंय. बालमृत्यू आणि कुपोषण इथल्या आदिवासींच्या पाचवीला पुजलंय. आईच्या पोटात असल्यापासून इथल्या आदिवासींच्या वाट्याला संघर्ष येतो. जन्मताच जगण्याचा संघर्ष... तिथंही मृत्यूला हुलकावणी दिली की कुपोषणाचा विळखा पडतो. त्यावरही मात केली की इथल्या आदिवासी मुलींचा चक्क सौदा मांडला जातो.






Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...