Skip to main content

Tag: women in agriculture

Browse all articles tagged with "women in agriculture"

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना…? खत अनुदानातील 'डीबीटी' क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण…!
ताज्या घडामोडी

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना…? खत अनुदानातील 'डीबीटी' क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण…!

केंद्र सरकार वार्षिक १.७ लाख कोटी रुपयांचे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्याच्या तयारीत आहे. यामुळे सध्या ₹२७० ला मिळणारी युरियाची गोणी थेट ₹२,४०० वर पोहोचणार असून, पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या 'भांडवली धक्क्याचा' सामना करावा लागणार आहे. पारदर्शकता आणि गळती रोखण्याच्या या प्रयत्नात ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील सावकारी पाश अधिक घट्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

5 min read
V
Vikrant Patil
कामगार संघर्षांचा ‘अविरत पहारेकरी’ हरपला..!
ताज्या घडामोडी

कामगार संघर्षांचा ‘अविरत पहारेकरी’ हरपला..!

पुण्याच्या रस्त्यांवर आज एक असामान्य शांतता आहे. जिथे हमालांच्या काठीचा आवाज ऐकू यायचा, तिथे आज शोक पसरलेला आहे. आयुष्यभर फुटपाथ, दुकानांच्या ओसऱ्या, बांधकामांची धूळ आणि झोपडपट्ट्यांतील अंधारात झगडणाऱ्या श्रमिकांच्या हातात आशेची ज्योत पेटवणारे डॉ. बाबा आढाव आता नाहीत. सोमवारी रात्री वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला...

5 min read
A
Apsara Aga
“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."
Video content

“Venice Film Festival मध्ये इतिहास रचणारी Anuparna Roy सोशल मीडियावर झाली ट्रोल..."

अनुपर्णा रॉय... बंगालमधील एका छोट्या खेड्यातून निघून मुंबईत येऊन संघर्ष करत, थेट व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय महिला दिग्दर्शक. पण ज्या अनुपर्णाचा आपल्या देशाला अभिमान वाटायला हवा होता, त्याच अनुपर्णावर आज सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. कारण काय? तिचं भाषण, तिची मते आणि त्यावर झालेलं ट्रोलिंग. हे सगळं आम्ही या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत.

टीम बाईमाणूस
अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’
कला / साहित्य / सिनेमा

अहिल्यानगरच्या ‘शेवगाव’मध्ये पारंपारिक ‘लोककलावंतांची फॅक्टरी’

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील दोन लोक कलावंतांना एकाच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविणे ही अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या पुरस्काराने अहिल्यानगर जिल्ह्यातील समस्त लोक कलावंतांचा सन्मान झाला आहे

5 min read
भगवान राऊत
पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे
ताज्या घडामोडी

पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार? जाणून घ्या सर्वात मोठे फायदे

भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय कृषी क्षेत्रासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे ठरू शकतात.

5 min read
विक्रांत पाटील
कबीराचं निसटलेलं बोट…
ग्राउंड रिपोर्ट

कबीराचं निसटलेलं बोट…

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत सहभागी झालेल्या एका कारसेवक देशभरात उसळलेल्या दंगली आणि निष्पाप लोकांचे मृत्यू पाहून अपराधी भावनेने ग्रासून जातो. नंतर धर्म, देव अशी सगळी लेबलं फेकून देऊन त्याने निखळ माणूसपणाकडं केलेल्या वाटचालीची ही गोष्ट…

5 min read
प्रदीप आवटे
इंडिगो जमिनीवर
ताज्या घडामोडी

इंडिगो जमिनीवर

वाढत्या विमान अपघातांना आळा घालण्यासाठी काही नियमांमध्ये बदलक करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयने घेतला. गेल्या वर्षभरापासून हा नियम कधीही लागू होण्याची शक्यता होती; परंतु देशाच्या विमान क्षेत्रात साठ टक्क्यांहून अधिक विमान सेवा देणाऱ्या ‘इंडिगो’ने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर जुलैमध्ये या नियमांची अंबलबजावणी झाल्यानंतर वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे होते. या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने ‘इंडिगो’ची सेवा विस्कळीत झाली आणि प्रवासी हवालदील झाले.

5 min read
भागा वरखडे
घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद
ताज्या घडामोडी

घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान असते तर देश कसा असता? राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.

5 min read
राजेंद्र प्रसाद
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी
ताज्या घडामोडी

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

महाराष्ट्रात मंजूर झालेले ‘विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे अडकले आहे. सरकार म्हणते, हे राज्यविरोधी आणि नक्षल विचारांच्या गटांवर नियंत्रणासाठी आहे; तर विरोधकांच्या मते हा कायदा गैरवापर करून आवाज दडपण्याचा मार्ग ठरू शकतो.

5 min read
कोमल ठोंबरे
राज्यात १५ हजारहून अधिक मुली शिक्षणापासून वंचित, देशातील परिस्थितीही चिंताजनक
ताज्या घडामोडी

राज्यात १५ हजारहून अधिक मुली शिक्षणापासून वंचित, देशातील परिस्थितीही चिंताजनक

बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या पाच वर्षात शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 67.5 लाख इतकी असून यात निम्मे प्रमाण किशोरवयीन मुलीचें आहे. महाराष्ट्रात मुलींची हीच संख्या 15 हजारहून अधिक आहे. या आकडेवारीमुळे शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडत असलेले विध्यार्थी आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांची ही संख्या याबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

5 min read
S
Shantanu Khuje
बाई पुरुषावर बलात्कार करू शकते का? कायदा काय सांगतो?
ताज्या घडामोडी

बाई पुरुषावर बलात्कार करू शकते का? कायदा काय सांगतो?

पुणे शहरात महिलेकडून पुरुषावर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात चर्चा रंगली आहे. सामान्यतः अत्याचाराच्या तक्रारी महिलांकडून येतात, मात्र या वेळी चित्र पूर्ण उलट आहे. विवाहित दोन मुलींचा बाप असलेल्या पुरुषाने धैर्य एकवटून पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमुळे पीडित फक्त स्त्रीच असते, हा समाजातील एकतर्फी समज ढासळू लागल्याचं दिसत आहे. या केसमधून पुरुषांवरील लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंगचं वास्तवही पुढे येत असल्याचं जाणवत आहे.

5 min read
विठ्ठल साबळे
‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
ताज्या घडामोडी

‘शुद्धतेच्या’ नावाखाली जखमा! ‘खतना’ प्रथेला संविधानिक कसोटी, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

दाऊदी बोहरा समाजातील मुलींच्या जननेंद्रिय विच्छेदन (एफजीएम) म्हणजेच 'खतना' प्रथेच्या संविधानिक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस बजावली असून, धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली 'मुलींच्या शारीरिक अखंडतेचे उल्लंघन' होऊ शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले आहे. हा विषय आता राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर वळण घेत आहे.

5 min read
अप्सरा आगा