Skip to main content

BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

Article in Marathi
संजना खंडारे
08 Dec 2025
5 min read
11 views
BaiManus Impact : मायक्रोफायनान्सच्या जाचात होरपळलेल्या सोनपेठच्या महिलांची प्रशासनाने घेतली दखल...

- संजना खंडारे 

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महिलांवर मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक छळाविषयीच्या बातमीनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. 

गेल्याच आठवड्यात बाईमाणूसने मायक्रोफायनान्स बँकांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांना कोणत्या अडचणीतून जावे लागते यावर सविस्तर ग्राउंड रिपोर्ट करून प्रकाशित केला होता. त्याच बातमीचा आढावा घेऊन परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याचे तहसीलदार सुनील कावरे यांनी दखल घेतली आहे. 

बाईमाणूसने केलेला ग्राउंड रिपोर्ट (https://baimanus.in/mr/article/microfinance-debt-trap-climate-change-crisis-rural-women-marathwada)

“महिलांना दिलासा देण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करू”

"मायक्रोफायनान्स कंपन्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या देखरेखीखाली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) श्रेणीत येतात आणि RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांचे नियमन होते. पण तालुक्याच्या पातळीवर आम्हाला ज्या उपायोजना करता यायेतील आणि त्या महिलांची मदत करता येईल ते आम्ही नक्कीच करू. जर आमच्या पातळीवर काही करता नाही आलं तर हे प्रकरण वरिष्टांपर्यंत आम्ही नक्कीच पोहचू आणि यावर लवकरात लवकर काय उपायोजना करता येईल यावर चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू." - सुनील कावरे 



हवामान बदलामुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर परिणाम झाला असून मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात त्या अडकल्या आहेत. अतिवृष्टी, ढगफुटी व दुष्काळामुळे शेतात काम नाही, उत्पन्न नाही, पण कर्जवसुलीची दडपशाही वाढत असून महिलांना मानसिक-शारीरिक छळ सोसावा लागत आहे. परभणीतील सारिकाने आर्थिक ताणामुळे आत्महत्या केली, तर सोनपेठच्या ललिता घोडके कर्जामुळे गाव सोडून गायब झाल्या. 99% मायक्रोफायनान्स कर्जदार महिला असून 25-40% व्याजदर व आठवड्याचे कठोर हप्त्यांनी त्या उद्ध्वस्त होत आहेत. तज्ञांच्या मते मायक्रोफायनान्स ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ‘संस्थात्मक सावकारी’ ठरत असून तातडीने कठोर नियंत्रणाची गरज आहे.

सोमनाथ नागुरे हे सोनपेठचे स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत बाईमाणूसशी बोलतांना त्यांनी सांगितले की, " गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मायक्रोफायनान्सच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बायका कशाप्रकारे बाहेर निघू शकतील यावर काम करत आहोत. बाईमाणुसने केली बातमी आम्ही गावातील व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर केली आणि कोणीतरी ती तहसीलदार साहेबांपर्यंत पोहचवली. आता बघुयात त्यांच्या माध्यमातून जर या महिला जर या जाचातून बाहेर निघू शकल्या तर बरं होईल."

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...