Skip to main content

“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे”.. दलित विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Article in Marathi
Sanjana Khandare
15 Dec 2025
19 views
“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे”.. दलित विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

 - संजना खंडारे

तिला शिकायचं होतं, पुढे जायचं होतं.. पण डोक्यावर बसलेलं इंग्रजी भाषेचं भुत आणि सततचच्या अपयशाचा ताण तिच्यासाठी असह्य ठरला. आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील एका 17 वर्षीय दलित विद्यार्थिनीने आत्महत्या केली असून, तिच्या मृत्यूने शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर टाकल्या जाणाऱ्या मानसिक दबावाचे विदारक वास्तव समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी आंध्रप्रदेशातील कुरनूलजवळील बी. तांड्रपाडु येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे घडली. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी याच संस्थेत शिक्षण घेत होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थिनीने कॉलेजच्या ‘सिक रूम’मध्ये स्वतःला कोंडून घेत टोकाचे पाऊल उचलले.

मित्र-मैत्रिणी बाहेर गेल्या आणि…? 

शाळेतील विद्यार्थिनींच्या माहितीनुसार , संबंधित विद्यार्थिनी तिच्या काही मैत्रिणींसोबत सिक रूममध्ये होती. काही वेळासाठी मैत्रिणी बाहेर गेल्या असताना तिने हे पाऊल उचलले. मैत्रिणी परत आल्यावर दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. दरवाजा उघडल्यावर विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

इंग्रजी भाषेमुळे मानसिक तणाव... 

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यामुळे तीव्र मानसिक तणावाखाली होती. ग्रामीण पार्श्वभूमी आणि मातृभाषेव्यतिरिक्त थेट इंग्रजी माध्यमात शिक्षण घेताना तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अभ्यासात मागे पडत असल्याची भीती आणि सतत अपयशाची भावना तिच्या मनावर खोलवर परिणाम करत होती.

पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनीने आपल्या वडिलांशी याबाबत अनेकदा संवाद साधला होता. तिने इंग्रजी समजत नसल्यामुळे होणारा त्रास स्पष्टपणे व्यक्त केला होता. तपासादरम्यान एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये तिने, “इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणे सोपे आहे,” असे लिहिल्याचे समोर आले आहे. हे शब्द तिच्या मानसिक अवस्थेचे भयावह चित्र उभे करतात.



पालकांचा दबाव आणि असहायता... 

विद्यार्थिनीने मानसिक  ताण स्पष्ट करूनही तिच्या पालकांनी तिला पुन्हा कॉलेजला पाठवले होते. शिक्षण पूर्ण व्हावे, चांगले भविष्य मिळावे या अपेक्षेने पालकांनी तिला समजावले असले, तरी प्रत्यक्षात त्यामुळे तिच्यावरचा मानसिक दबाव अधिकच वाढल्याचे पोलिस तपासातून दिसून येत आहे. समाजातील अनेक कुटुंबांप्रमाणेच येथेही शिक्षणाला सामाजिक उन्नतीचे एकमेव साधन मानले जाते, मात्र त्याची किंमत विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या रूपाने चुकवावी लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.

आरोग्याच्या समस्यांनी वाढवला ताण... 

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा पैलू समोर आला आहे. विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी पोलिसांना सांगितले की, तिला मासिक पाळीशी संबंधित गंभीर समस्या होत्या. शारीरिक वेदना, कमजोरी आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक त्रास यामुळे तिची अवस्था अधिकच बिकट झाली होती. सततचा शैक्षणिक ताण आणि शारीरिक वेदना यांचा एकत्रित परिणाम तिच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय न्याय संहिता  कलम 194 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कॉलेज प्रशासन, पालक, मित्रमैत्रिणी यांचे जबाब नोंदवले जात आहेत. विद्यार्थिनीला कोणत्याही प्रकारचा छळ झाला होता का, याचाही तपास केला जात आहे.

ही घटना केवळ एका विद्यार्थिनीचा मृत्यू नसून, देशातील शिक्षणव्यवस्थेतील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकणारी आहे. इंग्रजी भाषेचे अधिक महत्त्व, ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी  मानसिक आणि शैक्षणिक मदत नसणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष  या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

 

Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...