Skip to main content

जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

Article in Marathi
कोमल ठोंबरे
05 Dec 2025
5 min read
4 views
जनसुरक्षा की गळचेपी? महाराष्ट्राच्या वादग्रस्त विधेयकावर केंद्राची छाननी

कोमल ठोंबरे       

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024’ हे सध्या केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे तपासणीसाठी पाठवले असून, अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकारचा दावा आहे की, गेल्या काही वर्षांत शहरी भागात वाढत असलेल्या नक्षलवादाला आणि राज्यविरोधी कामांना आळा घालण्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. मात्र विरोधी पक्ष आणि अनेक मानवाधिकार संघटना या विधेयकाला लोकशाहीविरोधी म्हणत आहेत. त्यामुळे हा कायदा लागू होईल का नाही, याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

जन सुरक्षा विधेयक म्हणजे नेमके काय?

या विधेयकाचा उद्देश समाजात अस्थिरता निर्माण करणाऱ्या आणि राज्याच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या गटांवर त्वरित कारवाई करण्याचा आहे. सरकारला कोणत्याही गटाला ‘बेकायदेशीर’ घोषित करण्याचा अधिकार यात दिला आहे. अशा गटांमधील व्यक्तींवर कठोर कारवाई, दंड आणि शिक्षा करण्याचाही यात समावेश आहे.



सरकारच्या मते, काही संघटना किंवा व्यक्ती थेट हिंसाचार न करता विचारांच्या माध्यमातून असंतोष वाढवतात. विशेषतः शहरांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली वाढत असल्याने, स्थानिक परिस्थिती लक्षात ठेवून स्वतंत्र कायदा आवश्यक असल्याचे सरकार सांगते. ज्या प्रकारे काही गट विद्यार्थ्यांमध्ये भ्रम निर्माण करतात किंवा समाजात गोंधळ घालतात, त्यांना रोखण्यासाठी हा कायदा उपयोगी ठरेल, असा विश्वास राज्य सरकार व्यक्त करते.

ही गरज का निर्माण झाली?

राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत ‘शहरी नक्षलवाद’ वाढत असल्याची चर्चा होती. अशा गटांचा उद्देश थेट हिंसाचार नसतो, तर विचार पसरवणे, असंतोष निर्माण करणे आणि भूमिगत संघटनांना मदत करणे हा असतो. केंद्राचा विद्यमान कायदा (UAPA) असला तरी, स्थानिक परिस्थितीत ते पुरेसे न ठरत असल्याचा सरकारचा दावा आहे.

राज्य सरकारने म्हटलं आहे की, सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतंत्र आणि जलद कारवाई करणारा कायदा आवश्यक आहे. या विधेयकात पोलिसांना काही अतिरिक्त अधिकार दिले असून, तपास आणि अटक प्रक्रियेतील विलंब टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

विरोधकांचा आक्षेप काय?

विरोधी पक्ष आणि अनेक नागरी संघटनांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या मते, या कायद्यात ‘बेकायदेशीर कृत्य’ ही व्याख्या अतिशय अस्पष्ट आहे. याचा अर्थ, सरकारला नको असलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटना सहजपणे अशा यादीत टाकली जाऊ शकते.



विरोधक म्हणतात की, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते किंवा सरकारवर टीका करणारे कोणाही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अडकवता येईल. पोलिसांना दिलेले अधिकार इतके मोठे आहेत की त्याचा गैरवापर होऊ शकतो. देशात आधीच कडक कायदे (जसे UAPA, MCOCA, NSA) अस्तित्वात असताना, आणखी एक कठोर कायदा आणण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकांच्या भाषण आणि मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणू शकतो. काही संघटनांचे मत आहे की, सरकारविरोधी आवाज दाबण्यासाठी हा कायदा ‘गळचेपीचं साधन’ बनू शकतो.

विधेयकातील बदल आणि समितीची भूमिका

विरोधानंतर हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवले गेले. समितीने काही सुधारणा सुचवल्या आणि त्या सरकारने स्वीकारल्या. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘सल्लागार मंडळ’. कोणत्याही गटाला किंवा व्यक्तीला ‘बेकायदेशीर’ घोषित करण्यापूर्वी सरकारला या मंडळाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या मंडळाचे प्रमुख उच्च न्यायालयातील माजी किंवा निवृत्त न्यायाधीश असतील. यामुळे निर्णयात काही प्रमाणात न्यायपालिका सहभागी राहील आणि गैरवापराची भीती कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. तरीही विरोधकांचे मत आहे की, मूलभूत मुद्दे बदललेले नाहीत आणि कायदा अद्याप कठोरच आहे.

केंद्राची भूमिका आणि पुढील प्रक्रिया

राज्यात विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवले जाते. त्याआधी केंद्र सरकारचे गृह मंत्रालय या विधेयकाची सविस्तर तपासणी करते. तपासणी करताना  हा कायदा केंद्राच्या विद्यमान कायद्यांशी विसंगत आहे का? संविधानातील मूलभूत हक्कांना बाधा आणतो का? कायद्यातील कारवाईची पद्धत न्याय्य आहे का? या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.  जर गृह मंत्रालयाला यात काही विसंगती किंवा त्रुटी दिसल्या, तर केंद्र सरकार ते सुधारणा करण्यासाठी राज्याकडे परत पाठवू शकते. सर्व निकष पूर्ण झाल्यासच राष्ट्रपतींची मंजुरी मिळेल आणि कायदा लागू होईल.



एका बाजूला सरकारचा दावा आहे की राज्यातील अशा बेकायदेशीर हालचालींना थांबवण्यासाठी कठोर कायदे आवश्यक आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचे मत आहे की कठोर कायद्यांचा इतिहास अनेकदा गैरवापराकडेच वळतो. ‘जनसुरक्षा की गळचेपी?’ या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे. या कायद्याने राज्यात शिस्त आणि सुरक्षा वाढेल की लोकशाहीवरील बंधने वाढतील, याचा निर्णय पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...