Skip to main content

न्यायालय आणि न्यायाधीशही प्रधानमंत्र्यांच्या तावडीत? 'सबकुछ मोदीजी की मुठ्ठी मे'...!

Shantanu Khuje
03 Dec 2025
5 min read
20 views
न्यायालय आणि न्यायाधीशही प्रधानमंत्र्यांच्या तावडीत? 'सबकुछ मोदीजी की मुठ्ठी मे'...!

सध्या देशामध्ये न्यायव्यवस्था संपूर्णपणे ताब्यात घेण्याचे गुजरातमधील राजकीय लॉबीचे  प्रयत्न चालले आहेत, असं दिसून येतं. म्हणजे थोड्याच काळात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट येथील न्यायाधीशांची  नियुक्ती, बढती तसेच बदली यांचे अधिकार मोदी सरकारच्या हातात जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

असा प्रश्न पडण्याचं कारण असे की, नुकतेच असे होण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्वतःच दिले आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश सूर्यकांत हे मोदींच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांसोबत बॅडमिंटन खेळताना दिसले. या बॅडमिंटन प्रॅक्टीसची माहिती 'संसदीय कामकाज मंत्री' किरण रिजिजू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून देताना म्हटलं की, 'फिट जजेस, फिट जुडिशियरी' म्हणजे ' न्यायाधीश फिट तर न्यायव्यवस्थाही फिट'. 

पुढे त्यांनी असेही ट्विट केले की, आज आपले सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि माझे सहकारी - कायदामंत्री अर्जुन मेघवाल यांच्यासोबत मी बॅडमिंटन खेळलो.' 



आता, सरन्यायाधीशांचे असे सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांसोबत बॅडमिंटन खेळणे योग्य आहे का असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, सरन्यायाधीशांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि सत्ताकेंद्रांशी एकप्रकारचं तटस्थ अंतर नेहमीच राखलं गेलं पाहिजे. पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनाला आणि आरतीला गेले ही गोष्टही शिष्टाचारात बसत नव्हतीच.

या प्रसंगावर ज्येष्ठ वकील अशोक अरोरा म्हणाले की “मी सरन्यायाधीश असतो आणि तुमच्याकडे गणपती दर्शनाला येऊ का असं मला पंतप्रधानांनी विचारलं असतं तर मी त्यांना नकार दिला असता. कारण पद आणि जबाबदाऱ्या सांभाळण्या अगोदर संविधानाची शपथ सरन्यायाधीश ही घेतात आणि पंतप्रधानही घेतात. त्या संविधानानुसार या दोन्ही पदांमध्ये उचित अंतर असले पाहिजे, अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी खाजगी भेटीगाठी घेतल्याने त्यातून जनतेला  चुकीचा संदेश जातो, त्यामुळे न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेवर, निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उमटू शकते. हीच गोष्ट टाळावी असे बाबासाहेबानी स्पष्टपणे म्हटले आहे. 

संबंधित चर्चेची लिंक : क्या अदालतें और जज भी प्रधानसेवक के होंगे ? | जजों की नियुक्ति में सरकार की एंट्री ?



आता खरी बातमी पाहू या… न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्याने अलीकडेच देशभरात खळबळ उडाली. सर्वोच्च न्यायालयापासून ते उच्च आणि खालच्या न्यायालयांपर्यंत सर्वत्र त्याच्याच चर्चा सुरू झाल्या. न्यायाधीश आणि वकिलांच्या वर्तुळात हे वक्तव्यच चर्चेचा मुख्य विषय ठरले. सूर्यकांत असे काय बोलले होते?

थोडक्यात पार्श्वभूमी अशी: मोदी सरकारने 2014 मध्ये 99वी घटनादुरुस्ती (99th Constitutional Amendment Act) आणली होती, ज्या योगे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन (NJAC) स्थापन केले जाणार होते. ही दुरुस्ती संविधानात अनुच्छेद 124ए, 124क आणि 124सी अशी जोडली जाणार होती, ज्यामुळे सर्वोच्च व उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांची नियुक्ती, बदली व कामाचे मूल्यमापन NJAC ने करणे बंधनकारक झाले असते. 

या प्रस्तावानुसार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि खालची सर्व न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्त्या आणि बदल्यांचे काम हीच समिती पाहणार होती आणि त्या समितीत प्रधानमंत्री, मुख्य न्यायमूर्ती (CJI), सर्वोच्च न्यायालयाचे दोन वरिष्ठ न्यायाधीश, केंद्रीय विधीमंत्री आणि दोन प्रतिष्ठित व्यक्ती (सर्वोच्च न्यायालयाने निवडलेल्या) असणार होत्या. मात्र, घटनेत केलेली ही दुरुस्ती 2015 साली 'अ-संवैधानिक' असा वैशिष्ट्यपूर्ण शेरा मारून सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आणि ती दुरुस्ती रद्दही केली.

सध्या, न्यायाधीशांचे कॉलेजियम किंवा महामंडळ हे या नियुक्त्या करीत असते आणि त्यात सर्वोच्च न्यायमूर्ती महामंडळाचे सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश असे एकूण पाच जण मिळून पुढील सर न्यायाधीश कोण असावा हे ठरवत असतात. त्यात सरकारचा किंवा अन्य कुणाचाही हस्तक्षेप नसतो. अशी आत्तापर्यंतची हीच पद्धत राहिली असून, त्यामुळे न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करत राहू शकते.

परंतु आता हा 2015 सालीच निकालात निघालेला हा विषय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पुन्हा चर्चेत आणला आहे. त्यांनी यावर लवकरच पुनर्विचार करण्याची भाषा केल्याने वकील आणि न्यायाधीशांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण या एनजेएसी समितीत पंतप्रधान आणि सरकारचे मंत्री असल्यास त्यात सत्तेवर असलेल्यांचा सरळसरळ हस्तक्षेप होण्याची आणि हितसंबंध जोपासणारे लोकच नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, सूर्यकांत यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे ते पाहता त्यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे.

म्हणजे बघा ! मोदीजींच्या हातात 'राजापेक्षा जास्त राजनिष्ठ' असा मीडिया आहे, त्यांच्याच दोन दोस्तांच्या हातात बहुतांश माध्यमं आणि वाहिन्या आहेत, मोदीजींच्या मुठीत कॉर्पोरेट क्षेत्रातली बडीबडी  नावं  आहेत, मोदीजींच्या मुठीत लोकसभेचा अध्यक्ष आहे,  मोदीजींच्या नियंत्रणात निरनिराळे चेअरमन आहेत, मोदीजी स्वतःच मुख्य निवडणूक आयुक्त निवडतात, सीबीआयचे संचालक मोदीजीच निवडतात, ईडीचे संचालक मोदीजीच निवडतात, इन्कम टॅक्स संचालक मोदीजीच निवडतात, आणि आता जर का ही NJAC समिती स्थापन झाली तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील  न्यायाधीशही मोदीजीच निवडणार असा प्रकार होईल. 



हे सगळे ऐकून राहुल गांधी, ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन या सर्वांतही अस्वस्थता आहे. लोकशाहीत सत्तेच्या नियंत्रण आणि संतुलनाकरिताच सत्तेचे असे विकेंद्रीकरण केलेले असते. तरच लोकशाहीत सुरळीत आणि पारदर्शक राज्यकारभार चालू शकतो. पण सध्याच्या काळात सर्वच सत्ता मोदींच्या हातात एकवटताना दिसते आहे.आता 'दुनिया मेरी मुठ्ठी मे ' यासारखं 'सबकुछ मोदीजी की मुठ्ठी मे' असे होऊ शकते..

या चर्चेत बोलता बोलता विषय निघाला की, गुजरात दंगलीनंतर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मोदींना विचारलं गेलं होतं की, त्या दंगलीनंतर तुमच्याकडून काही चूक झाली का? तेव्हा मोदी म्हणाले होते, “एक चूक झाली ती म्हणजे मी मीडियाला ताब्यात घेतलं नाही.” हे सर्व बीबीसीच्या मुलाखतीत रेकॉर्डेड आहे. परंतु आता  वाटते  की तेव्हा मोदीजींनी अर्धीच गोष्ट सांगितली, त्यांना पुढे असे म्हणायचे असावे  की मी मीडियासोबत न्यायालयालाही काबूत ठेवायला हवे होते.

या चर्चेत भाग घेणारे वरिष्ठ वकील अशोक अरोरा यांनी सांगितले की,  माजी सरन्यायाधीश  चंद्रचूड आणि सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे दोघेही मला ज्युनिअर आहेत. ते म्हणाले की, सूर्यकांत यांचे वक्तव्य सरकारला खूश करणारे वक्तव्य आहे, नाराज करणारे तर नक्कीच नाही. पंतप्रधान मोदी 2014 सालापासून सलग सत्तेवर आहेत तेव्हापासूनच त्यांचा हेतू होता की संसदेच्या आतील आणि संसदेच्या बाहेरील सर्व संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या.

त्यांचा एकदा ताबा घेतला की त्यानंतर मग या संस्थांचे नियम, कायदेकानू, अंतर्गत कार्यप्रणाली या सगळ्यावर ताबा मिळवून त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावायचे. आत्तापर्यंतच्या अनुभवावरून दिसते की  या देशात साधे पान जरी हलले मग ते सुप्रीम कोर्टात असो, हायकोर्टात असो,  निवडणूक आयोगात असो की संसदेत असो, तरी त्या पानाने हलण्यापूर्वी मी हलू का? अशी मोदीजींची परवानगी घ्यायला हवी अशीच मोदीजींची इच्छा आहे, असे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीकडे पाहताना दिसते आहे. सरकार अशी एक यंत्रणा निर्माण करू इच्छिते की त्यामुळे पुढील काळात जो कोणी हुकूमशहा येईल त्याच्यासाठी मार्ग अधिक सोपा व्हावा.

सरकारसाठी ते करणे सुलभ व्हावे यासाठीच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एनजेएसी समितीवर पुनर्विचार करू असे म्हटले आहे. म्हणजे जी दुरवस्था  निवडणूक आयोगाची या देशात आज झाली आहे तेच दुर्दैवी दशावतार न्यायव्यवस्थेचेदेखील होणार. आता तुम्हीच सांगा, मोदी पंतप्रधान  कार्यालयातून न्यायाधीशांची नियुक्ती करत असतील.  त्यांची बढती, बदली या सगळ्या गोष्टी पंतप्रधान कार्यालयाच्या नियंत्रणात असतील  तर मग असे न्यायाधीश देशाच्या संविधानाशी एकनिष्ठ राहतील की मोदीशी एकनिष्ठ राहतील. त्यांचे हितसंबंध जोपासतील.

न्यायव्यवस्था सत्तेची बटीक बनवणे म्हणजे- या देशाचा जो पाया आहे असे संविधान रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घोर अपमान आहे. तुम्ही प्रत्यक्षात बाबासाहेबांचा विचार आचरणात आणत नसाल तर त्यांच्या जयंतीला आणि मृत्यूदिनाला त्यांच्या प्रतिमेस फक्त हार चढवून काहीच उपयोग नाही.

(‘जन-गण-मंगलदायक’ फेसबुक पेजवरून साभार)

 

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...