Skip to main content

आणखी एकीला डाकीण ठरवलं… नंदुरबारमध्ये काल्लीबाई ओल्या तडवीचा निर्घृण खून

Article in Marathi
सुमित्रा वसावे, नंदुरबार
27 Nov 2025
5 min read
3 views
आणखी एकीला डाकीण ठरवलं… नंदुरबारमध्ये काल्लीबाई ओल्या तडवीचा निर्घृण खून

सुमित्रा वसावे (नंदुरबार)    

धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबालहोजळ्या पाडा येथे डाकीण असल्याचा संशयावरुन एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत वृद्ध महिलेची हत्या करून पसार झालेल्या संशयित आरोपी महिलेला म्हसावद पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबालहोजळ्या पाडा येथे राहणाऱ्या काल्लीबाई ओल्या तडवी (वय 65) यांच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची मुलगी खारकी ही कुटुंबासोबत मजुरीसाठी पंढरपूर (जिल्हा सोलापूर) या भागात गेली आहे. यामुळे काल्लीबाई घरी एकट्याच होत्या. त्याच गावातील समका नारसिंग तडवी वारंवार आजारी पडत होते.

काल्लीबाई या डाकीण असल्याचा संशय घेत त्या जादूटोणा करीत असल्याने समका नारसिंग तडवी वारंवार आजारी पडत होते, असा समज झाला. मुलगी घरी नव्हती. यावेळी काल्लीबाई या घरात एकट्या होत्या. यादरम्यान 8 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काल्लीबाई या त्यांच्या राहत्या घरातील खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्यावर कुठल्या धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

संशयित समकाबाई हिने मयत काल्लीबाई यांना यापूर्वी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी, काकरपाटी उमरीमाळ पाडा येथील भीमसिंग हांद्या वसावे यांच्या फिर्यादीवरून समका नारसिंग तडवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर म्हसावद तालुका शहादा पोलिस ठाण्याच्या पथकाकडून संशयित महिलेचा शोध सुरु होता.

हा खून गावातीलच समका नारसिंग तडवी (वय 60) हिने केल्याचे समोर आले होते. या वृद्ध महिलेचा खून करून पसार झालेल्या या महिलेस म्हसावद पोलिसांनी धडगाव तालुक्यातून 11 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत, अशी माहिती आहे.



नंदुरबारमध्ये डाकीण प्रथा आजही अस्तित्वात

नंदुरबार जिल्ह्यात गावातील एखाद्या महिलेला डाकीण ठरवून अनन्वित अत्याचार करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. अवघे जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आणि महिलांना जवळपास सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध होत असताना शिक्षणात बराच पिछाडीवर असणारा आदिवासी बांधव अद्याप वेगवेगळ्या अंधश्रद्धेत गुरफटला आहे. त्यातील डाकीण ठरविण्याची प्रथा म्हणजे क्रूरतेचा कळसच.

सुशिक्षितांचे प्रमाण कमी असल्याने गावकऱ्यांच्या डोक्यात ही अंधश्रद्धा अशी काही भिनली आहे की, ते कोणाचे ऐकण्यास तयार होत नाहीत. एखाद्या गावात काही विपरीत घटना घडल्यास गावकऱ्यांचे अकलेचे तारे तोडण्याचे काम सुरू होते. एखाद्या कुटुंबातील सदस्य एकसारख्या आजारांनी आजारी पडण्याचे कारणही त्यांना पुरेसे ठरते.

या कुटुंबीयांमार्फत वैद्यकीय सल्ला घेण्याऐवजी मांत्रिक अर्थात भगताकडे धाव घेतली जाते. त्याच्यासमोर सर्व घडामोडींचा वृत्तान्त मांडला जातो. या अंधश्रद्धेला खतपाणी   घालणारा प्रमुख  घटक  कोणी असेल तर तो हा मांत्रिक. कारण, हा मांत्रिक गावातील  एखाद्या महिलेकडून या घटना घडत असल्याचे सांगतो. कशाला कशाचा आधार  नसताना मांत्रिकाकडून विपरीत घडलेल्या घटनांचा दोष एखाद्या महिलेवर टाकला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे, मांत्रिक त्या महिलेचे नाव काही केल्या सांगत नाही. अंदाजपंचे काही ठोकताळे मांडून संबंधित महिलेच्या घराजवळील खाणाखुणा जमलेल्या गावकऱ्यांना सांगतो. हे आडाखे ज्या महिलेशी जुळतात, त्या स्त्रीवर डाकीण असल्याचे शिक्कामोर्तब केले जाते.



मांत्रिकाकडून ही तथ्यहीन प्रक्रिया पार पाडली गेली की, अंधश्रद्धा टोकाला जाण्यास सज्ज होते. डाकीण ठरविलेली महिला आर्थिक दुर्बल घटकातील असते. गावकऱ्यांचा प्रतिकार करण्याइतकी तिच्यात क्षमता नसते. आजवर डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकल्यास हीच बाब लक्षात येते.

या महिलेचे हरप्रकारे शोषण केले जाते. मारहाण, शिवीगाळ, गावातून बहिष्कृत करून हकालपट्टी, कुटुंबातील सदस्यांना शक्य तितका त्रास देण्याचे सत्र सुरू होते. आपण डाकीण नसल्याचा टाहो संबंधित महिला फोडत असली तरी तिच्या आर्जवाकडे कोणी लक्ष देत नाही. अनेकदा कोणाच्या नजरेसमोर यायचे नाही म्हणून तिच्यावर बंधने लादली जातात. परिणामी, कित्येक महिलांवर या शोषणात गाव सोडून परागंदा होण्याची वेळ आली आहे. कित्येकींना प्राणदेखील गमवावे लागले.

काय आहे शिक्षा?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नंदुरबार जिल्ह्यात डाकीण प्रथा विरोधी परिषदा, संवाद यात्रा भरवण्यात आल्या. पोलीस विभागाच्याही काही मोहिमा झाल्या. सरकार, प्रशासनानं डाकीण प्रथा संपवण्याचे थोडे फार प्रयत्नही केले. पुढे 2013 ला महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादुटोणा विरोधी कायदाच आला. त्यातल्या सहाव्या आणि सातव्या अनुसूचीप्रमाणे, एखादी व्यक्ती करणी करते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते, तिच्यामुळे रोगराई पसरते, कोणाला खाते असं म्हणणं, चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, नग्न धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं गुन्हा असल्याचं म्हटलं गेलं. गुन्हा करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठरली.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...